परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले

दीपक मोहिते


मुंबई : राज्याच्या अनेक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. १५ दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक पिके धोक्यात आली आहेत. तर शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. दरम्यान हवामान विभागाने उद्या ऑरेंज व परवा रेड अलर्ट जाहीर केला आहे. हा परतीचा पाऊस असून तो यंदाही शेतीला फटका देणारा ठरणार आहे, अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत.


गेल्या काही वर्षापासून राज्यात पर्जन्यमानाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. पावसाचे आगमन उशीराने होणे, मध्येच पावसाचे गायब होणे व शेती बहरल्यानंतर जाता जाता पिकांना फटका देणे, असे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. मात्र यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाले, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे वेगाने हातावेगळी केली. त्यानंतर सलग १५ ते २० दिवस हजेरी लावल्यानंतर पावसाने काढता पाय घेतला. त्यामुळे आवणी व लावणी इ. कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली.


सध्या कापणीची कामे सुरू असताना, अचानक पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे आज शेतकऱ्यांची प्रचंड धावपळ झाली. काल रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे राज्याच्या अनेक जिल्ह्यात शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. उद्या आणि परवा, अशा दोन दिवशी हवामान विभागाने अलर्ट दिल्यामुळे शेतकरी आता भितीच्या सावटाखाली आले आहेत.

Comments
Add Comment

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या

Pune: नर्सिंगच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने जीवनयात्रा संपवली; सुसाईड नोटमुळे संशय

पुणे: पुण्यातून काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीला तिच्या

केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज '१९व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या