Tirupati Laddu : जनावराच्या चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत अजून एक VIDEO व्हायरल

  208

खम्माम : आंध्र प्रदेशयेथील तिरुपती मधील श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये जनावरांच्या चरबीचा आणि निकृष्ट दर्जाच्या तूपाचा वापर केला जात होता, असं म्हणत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्यावर खूप गंभीर आरोप केला आहे. चंद्राबाबू नायडूंच्या या आरोपांनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पाठोपाठ लाडवांच्या नमुन्यामध्ये निम्न दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याचं तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) शुक्रवारी सांगितले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतायत. तिरुमला तिरुपती देवस्थान (Tirupati Balaji) हे जगभरात प्रसिद्ध आहे. अशातच या ठिकाणी असलेले प्रसादाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात. दरम्यान, या लाडवांमध्ये आता तंबाखू आढळल्याचा दावा एका भाविकाने केला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा येथील खम्माम जिल्ह्यातील रहिवासी दोंतू पद्मावती यांनी दावा हा केला आहे की तिरुपती मंदिरातून प्रसाद म्हणून मिळालेल्या लाडवांमध्ये त्यांना तंबाखूची पुडी आढळली आहे. या महिलेने म्हटलं आहे की तिने प्रसादात मिळालेले लाडू घरी नेले होते. मात्र, तंबाखूची कागदाची पुडी त्या लाडवांमध्ये आढळली आहे. याचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. (आम्ही या व्हिडीओची पुष्टी केलेली नाहीये.)




पद्मावती काय म्हणाल्या ?


दोंतू पद्मावती या खम्माम जिल्ह्यातील कार्तिकेय परिसरात राहणाऱ्या १९ सप्टेंबर रोजी तिरुमाला मंदिरात गेल्या होत्या. प्रत्येक भक्ताप्रमाणे तिथे जाणाऱ्या पद्मावती यांना देखील तिथे प्रसाद मिळाला होता. तो प्रसाद त्यांनी घरी नेला आणि कुटुंबातील सदस्यांसोबतच नातेवाईक व शेजाऱ्यांना वाटला. पद्मावती म्हणाल्या, “आम्ही लाडूचं पाकीट उघडलं, लोकांमध्ये वाटण्यासाठी लाडूचे तुकडे केले. त्यावेळी कागदाच्या पुडीत बांधलेली तंबाखू आम्हाला त्यामध्ये आढळली. लाडवामध्ये तंबाखू असल्याचं पाहून आम्हा सर्वांना धक्का बसला. हा प्रसाद पवित्र असेल असं आम्हाला वाटलेलं, मात्र प्रसादात तंबाखू असल्याचं बघून आम्हा सर्वांनाच खूप वाईट वाटलं”. दरम्यान पद्मावती यांनी केलेल्या या दाव्याने सर्वानाच धक्का बसला आहे.




चंद्राबाबू नायडूंचा नेमका आरोप काय?


चंद्राबाबू नायडू म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा त्यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानचं (Tirupati Balaji) पावित्र्य घालवून टाकलं. मंदिरातर्फे जे अन्नदान केलं जातं अर्थात‘अन्नदानम’ त्याच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद म्हणून मानले जातात. या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला. सरकार आमचं आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही आम्ही खूप सुधारला आहे.



Comments
Add Comment

PM Modi : एनडीएच्या बैठकीत मोदींचा सत्कार; 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'महादेव'च्या यशावर अभिनंदनाचा वर्षाव! पाहा VIDEO

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्ली येथे झालेल्या एनडीए संसदीय

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन