Tirupati Laddu : जनावराच्या चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत अजून एक VIDEO व्हायरल

खम्माम : आंध्र प्रदेशयेथील तिरुपती मधील श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये जनावरांच्या चरबीचा आणि निकृष्ट दर्जाच्या तूपाचा वापर केला जात होता, असं म्हणत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्यावर खूप गंभीर आरोप केला आहे. चंद्राबाबू नायडूंच्या या आरोपांनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पाठोपाठ लाडवांच्या नमुन्यामध्ये निम्न दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याचं तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) शुक्रवारी सांगितले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतायत. तिरुमला तिरुपती देवस्थान (Tirupati Balaji) हे जगभरात प्रसिद्ध आहे. अशातच या ठिकाणी असलेले प्रसादाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात. दरम्यान, या लाडवांमध्ये आता तंबाखू आढळल्याचा दावा एका भाविकाने केला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा येथील खम्माम जिल्ह्यातील रहिवासी दोंतू पद्मावती यांनी दावा हा केला आहे की तिरुपती मंदिरातून प्रसाद म्हणून मिळालेल्या लाडवांमध्ये त्यांना तंबाखूची पुडी आढळली आहे. या महिलेने म्हटलं आहे की तिने प्रसादात मिळालेले लाडू घरी नेले होते. मात्र, तंबाखूची कागदाची पुडी त्या लाडवांमध्ये आढळली आहे. याचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. (आम्ही या व्हिडीओची पुष्टी केलेली नाहीये.)




पद्मावती काय म्हणाल्या ?


दोंतू पद्मावती या खम्माम जिल्ह्यातील कार्तिकेय परिसरात राहणाऱ्या १९ सप्टेंबर रोजी तिरुमाला मंदिरात गेल्या होत्या. प्रत्येक भक्ताप्रमाणे तिथे जाणाऱ्या पद्मावती यांना देखील तिथे प्रसाद मिळाला होता. तो प्रसाद त्यांनी घरी नेला आणि कुटुंबातील सदस्यांसोबतच नातेवाईक व शेजाऱ्यांना वाटला. पद्मावती म्हणाल्या, “आम्ही लाडूचं पाकीट उघडलं, लोकांमध्ये वाटण्यासाठी लाडूचे तुकडे केले. त्यावेळी कागदाच्या पुडीत बांधलेली तंबाखू आम्हाला त्यामध्ये आढळली. लाडवामध्ये तंबाखू असल्याचं पाहून आम्हा सर्वांना धक्का बसला. हा प्रसाद पवित्र असेल असं आम्हाला वाटलेलं, मात्र प्रसादात तंबाखू असल्याचं बघून आम्हा सर्वांनाच खूप वाईट वाटलं”. दरम्यान पद्मावती यांनी केलेल्या या दाव्याने सर्वानाच धक्का बसला आहे.




चंद्राबाबू नायडूंचा नेमका आरोप काय?


चंद्राबाबू नायडू म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा त्यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानचं (Tirupati Balaji) पावित्र्य घालवून टाकलं. मंदिरातर्फे जे अन्नदान केलं जातं अर्थात‘अन्नदानम’ त्याच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद म्हणून मानले जातात. या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला. सरकार आमचं आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही आम्ही खूप सुधारला आहे.



Comments
Add Comment

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ९ मार्चपर्यंत स्थगित

नवी दिल्ली : लोकसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. पीठासीन अधिकारी संध्या राय यांनी

Narendra Modi: अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 'सेवा तीर्थ'चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सेवा

Bihar: एका दाम्पत्याला रोझ डे सेलिब्रेशन पडलं महागात; पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा

बिहार: बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात 'रोझ डे'चे सेलिब्रेशन एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. दारूबंदी

डिझेल गाड्या कायमच्या होणार बंद ? काय सांगतो नीती आयोगाचा अहवाल?

मुंबई: भारतात प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना