Siddhivinayak Prasad : भाविकांच्या जीवाशी खेळ! सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदराची पिल्लं

व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ


मुंबई : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी तसेच फिश ऑईल मिसळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाला वाद फुटत असताना अशीच घटना पुन्हा घडल्याचे समोर आले आहे. मुंबइतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या (Siddhivinayak Temple) प्रसादात (Laddu Prasad) उंदरांनी थैमान घातला असल्याची माहिती मिळाली आहे.


सिद्धीविनायक मंदिरात प्रसाद ठेवलेल्या ट्रेमध्ये उंदराने पिल्लांना जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडीओमध्ये उदरांनी चक्क प्रसादाची पाकिटे कुरतडून लाडू खाल्ल्याचेही दिसून येत आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून भाविकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.



स्वच्छतेचा प्रश्न उकिरड्यावर


समोर आलेल्या व्हिडीओनुसार, सिद्धीविनायक प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्लं दिसत आहेत. लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदराने पिल्लं दिली आहेत. त्यामुळे नागरिकांकडून सिद्धिविनायक मंदिरांच्या स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



अध्यक्षांनी आरोप फेटाळले


दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असते. समोर आलेला व्हिडीओ मंदिर परिसरातील नसून यामागे कोणाचं तरी षडयंत्र असल्याचं सरवणकर म्हणाले. तसेच कोणीतरी प्लॅस्टिकमध्ये उंदीर घालून ते प्रसादात ठेवले आणि त्याचा व्हिडीओ काढला असावा, असेही सरवणकर म्हणाले.

Comments
Add Comment

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग

मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर

मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून,

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या