Siddhivinayak Prasad : भाविकांच्या जीवाशी खेळ! सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदराची पिल्लं

  133

व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ


मुंबई : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी तसेच फिश ऑईल मिसळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाला वाद फुटत असताना अशीच घटना पुन्हा घडल्याचे समोर आले आहे. मुंबइतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या (Siddhivinayak Temple) प्रसादात (Laddu Prasad) उंदरांनी थैमान घातला असल्याची माहिती मिळाली आहे.


सिद्धीविनायक मंदिरात प्रसाद ठेवलेल्या ट्रेमध्ये उंदराने पिल्लांना जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडीओमध्ये उदरांनी चक्क प्रसादाची पाकिटे कुरतडून लाडू खाल्ल्याचेही दिसून येत आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून भाविकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.



स्वच्छतेचा प्रश्न उकिरड्यावर


समोर आलेल्या व्हिडीओनुसार, सिद्धीविनायक प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्लं दिसत आहेत. लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदराने पिल्लं दिली आहेत. त्यामुळे नागरिकांकडून सिद्धिविनायक मंदिरांच्या स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



अध्यक्षांनी आरोप फेटाळले


दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असते. समोर आलेला व्हिडीओ मंदिर परिसरातील नसून यामागे कोणाचं तरी षडयंत्र असल्याचं सरवणकर म्हणाले. तसेच कोणीतरी प्लॅस्टिकमध्ये उंदीर घालून ते प्रसादात ठेवले आणि त्याचा व्हिडीओ काढला असावा, असेही सरवणकर म्हणाले.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून