Siddhivinayak Prasad : भाविकांच्या जीवाशी खेळ! सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदराची पिल्लं

व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ


मुंबई : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी तसेच फिश ऑईल मिसळल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाला वाद फुटत असताना अशीच घटना पुन्हा घडल्याचे समोर आले आहे. मुंबइतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या (Siddhivinayak Temple) प्रसादात (Laddu Prasad) उंदरांनी थैमान घातला असल्याची माहिती मिळाली आहे.


सिद्धीविनायक मंदिरात प्रसाद ठेवलेल्या ट्रेमध्ये उंदराने पिल्लांना जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडीओमध्ये उदरांनी चक्क प्रसादाची पाकिटे कुरतडून लाडू खाल्ल्याचेही दिसून येत आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून भाविकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.



स्वच्छतेचा प्रश्न उकिरड्यावर


समोर आलेल्या व्हिडीओनुसार, सिद्धीविनायक प्रसादाच्या पाकिटांवर उंदराची पिल्लं दिसत आहेत. लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदराने पिल्लं दिली आहेत. त्यामुळे नागरिकांकडून सिद्धिविनायक मंदिरांच्या स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



अध्यक्षांनी आरोप फेटाळले


दरम्यान, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असते. समोर आलेला व्हिडीओ मंदिर परिसरातील नसून यामागे कोणाचं तरी षडयंत्र असल्याचं सरवणकर म्हणाले. तसेच कोणीतरी प्लॅस्टिकमध्ये उंदीर घालून ते प्रसादात ठेवले आणि त्याचा व्हिडीओ काढला असावा, असेही सरवणकर म्हणाले.

Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ