Price Hike : सणासुदीच्या काळात महागाईची झळ! भाज्या, खाद्यतेलासह सुका मेवाही कडाडला

मुंबई : सध्या सणासुदीचा काळ सुरु असून अशातच सर्वसामान्यांना महागाईची (Inflation) झळ सोसावी लागत आहे. भाज्यांचे दर कडाडले (Vegetables Price Hike) असताना मागील आठवड्यात खाद्यतेलांचा (Food Oil) भडका उडाला. अशातच नवरात्री, दिवाळी, दसरा या सारख्या सणांच्या कालावधीत प्रत्येक घरात गोडाचे पदार्थ बनवले जातात. मात्र यासाठी लागणाऱ्या सुका मेवाचे (Dry Fruits) दरही वाढले आहेत. त्यामुळे ऐन सणांच्या काळात गृहीणींचे बजेट कोलमडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी उत्सव जवळपास महिनाभरावर आली असताना दिवाळीत खाद्यतेलांसह सुका मेवा आणि इतर वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ होते. परंतु खाद्यतेलांवरील आयात शुल्कात २० टक्के वाढ केल्याने गेल्या आठवडाभरापासून खाद्यतेलांच्या दरांत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच खोबरे, जायफळ, शहाजिरे, मखाणा, काजू आदी वस्तूंच्याही दरवाढीने सर्वसामान्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत दरांत अधिक वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.



काय आहेत घाऊक बाजारातील दर?


खाद्यतेल (प्रति १५ किलो)

  • सूर्यफूल - २०२५

  • सोयाबीन - २०९०

  • शेंगदाणा - २७००


इतर पदार्थ

  • खोबरे २८० रुपये

  • मखाणा १६०० रुपये

  • काजू ९५० रुपये

  • शहाजिरे १००० रुपये

  • खोबरे किस ३०० रुपये

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या