Price Hike : सणासुदीच्या काळात महागाईची झळ! भाज्या, खाद्यतेलासह सुका मेवाही कडाडला

मुंबई : सध्या सणासुदीचा काळ सुरु असून अशातच सर्वसामान्यांना महागाईची (Inflation) झळ सोसावी लागत आहे. भाज्यांचे दर कडाडले (Vegetables Price Hike) असताना मागील आठवड्यात खाद्यतेलांचा (Food Oil) भडका उडाला. अशातच नवरात्री, दिवाळी, दसरा या सारख्या सणांच्या कालावधीत प्रत्येक घरात गोडाचे पदार्थ बनवले जातात. मात्र यासाठी लागणाऱ्या सुका मेवाचे (Dry Fruits) दरही वाढले आहेत. त्यामुळे ऐन सणांच्या काळात गृहीणींचे बजेट कोलमडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी उत्सव जवळपास महिनाभरावर आली असताना दिवाळीत खाद्यतेलांसह सुका मेवा आणि इतर वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ होते. परंतु खाद्यतेलांवरील आयात शुल्कात २० टक्के वाढ केल्याने गेल्या आठवडाभरापासून खाद्यतेलांच्या दरांत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच खोबरे, जायफळ, शहाजिरे, मखाणा, काजू आदी वस्तूंच्याही दरवाढीने सर्वसामान्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत दरांत अधिक वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.



काय आहेत घाऊक बाजारातील दर?


खाद्यतेल (प्रति १५ किलो)

  • सूर्यफूल - २०२५

  • सोयाबीन - २०९०

  • शेंगदाणा - २७००


इतर पदार्थ

  • खोबरे २८० रुपये

  • मखाणा १६०० रुपये

  • काजू ९५० रुपये

  • शहाजिरे १००० रुपये

  • खोबरे किस ३०० रुपये

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री