Price Hike : सणासुदीच्या काळात महागाईची झळ! भाज्या, खाद्यतेलासह सुका मेवाही कडाडला

  91

मुंबई : सध्या सणासुदीचा काळ सुरु असून अशातच सर्वसामान्यांना महागाईची (Inflation) झळ सोसावी लागत आहे. भाज्यांचे दर कडाडले (Vegetables Price Hike) असताना मागील आठवड्यात खाद्यतेलांचा (Food Oil) भडका उडाला. अशातच नवरात्री, दिवाळी, दसरा या सारख्या सणांच्या कालावधीत प्रत्येक घरात गोडाचे पदार्थ बनवले जातात. मात्र यासाठी लागणाऱ्या सुका मेवाचे (Dry Fruits) दरही वाढले आहेत. त्यामुळे ऐन सणांच्या काळात गृहीणींचे बजेट कोलमडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी उत्सव जवळपास महिनाभरावर आली असताना दिवाळीत खाद्यतेलांसह सुका मेवा आणि इतर वस्तूंच्या मागणीत मोठी वाढ होते. परंतु खाद्यतेलांवरील आयात शुल्कात २० टक्के वाढ केल्याने गेल्या आठवडाभरापासून खाद्यतेलांच्या दरांत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच खोबरे, जायफळ, शहाजिरे, मखाणा, काजू आदी वस्तूंच्याही दरवाढीने सर्वसामान्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत दरांत अधिक वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.



काय आहेत घाऊक बाजारातील दर?


खाद्यतेल (प्रति १५ किलो)

  • सूर्यफूल - २०२५

  • सोयाबीन - २०९०

  • शेंगदाणा - २७००


इतर पदार्थ

  • खोबरे २८० रुपये

  • मखाणा १६०० रुपये

  • काजू ९५० रुपये

  • शहाजिरे १००० रुपये

  • खोबरे किस ३०० रुपये

Comments
Add Comment

आमदाराची मुलगी शासकीय आश्रम शाळेत शिकणार !

गडचिरोली : आजच्या काळात सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याच्या तयारीत असतात ,

मोठी बातमी : देवा विठ्ठला काय हे! पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना लुटून नंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

वारकऱ्यांनाही अडवून गळ्याला कोयता दौंड : आषाढी वारी (Ashadhi Wari 2025) हा संपूर्ण महाराष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण

उद्यापासून आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये मिळणार १५ टक्के सूट

मुंबई : एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी.पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट

पुणे जिल्ह्यात 'जल जीवन मिशन'ची यशस्वी वाटचाल

पुणे : पुणे जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! 'हर घर जल' अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील सुमारे चार लाख

विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली! दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

फलटण: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील नागपूरच्या दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना

Rajesh Meena: महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिवपदी वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश कुमार मीना यांची नियुक्ती

मुंबई: आज, ३० जून २०२५ रोजी वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश कुमार मीना (Rajesh Kumar Meena)  यांना मुख्य सचिवपदी (Chief Secretary of Maharashtra)