BCCI ने अचानक घेतला मोठा निर्णय, हे ३ खेळाडू नाही खेळणार दुसरी कसोटी

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी इराण कप २०२४ साठी मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडियाच्या स्क्वॉडची घोषणा केली आहे. ही टीम यासाठी चर्चेत आहे कारण यात अशा ३ खेळाडूंचा समावेश आहे ज्यांना बांगलादेशविरुद्ध निवडलेल्या भारतीय संघातून बाहेर करत इराणी कपमध्ये खेळण्यास सांगितले आहे. या ३ खेळाडूंना बाहेर केल्याने बांगलादेशला दुसरी कसोटी जिंकणे सोपे होईल?


भारत विरुद्ध बांग्लादेश दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरला कानपूरमध्ये खेळवला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मासह अनेक खेळाडू कानपूरमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या सुरक्षेची खास काळजी घेतली जात आहे. पहिल्या सामन्यातील कामगिरी पाहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.



३ खेळाडू नाही खेळणार दुसरी कसोटी


या तीन खेळाडूंचे नाव सर्फराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल आहे. हे तीनही खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या १५ सदस्यीय संघात सामील होते. मात्र त्यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. आता इराणी कपच्या जबाबदारीचे कारण सर्फराज खान, ध्रुव आणि यश दुसऱ्या कसोटी मिस करणार आहे. एकीकडे सर्फराज खान मुंबई टीमसाठी खेळेल. दुसरीकडे ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांना रेस्ट ऑफ इंडिया संघात स्थान मिळाले आहे.


श्रेयस अय्यर, इशान किशनपासून ते शार्दूल ठाकूरही भारताच्या कसोटी संघात पुनरागमनाची आशा आहे. हे सर्व खेळाडू इराणी कपमध्ये चांगली कामगिरी करत पुढील मालिकांसाठी टीम इंडियामध्ये स्थानासाठी दावेदारी ठोकू शकता.

Comments
Add Comment

KKRvsMI : कोलकाता नाईट रायडर्सला हरवत मुंबई इंडियन्सने वानखेडेवर मिळवला ऐतिहासिक विजय

मुंबई : मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना सहा विकेट राखून जिंकला. तब्बल १३ वर्षांनंतर मुंबई

R. Ashwin : आर. अश्विन आता अमेरिकेत खेळणार क्रिकेट : सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्ससोबत करार

नवी दिल्ली : भारताचा माजी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आता अमेरिकेच्या टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने

IPL 2026 : पहिला सामना हरण्याची मुंबई इंडियन्स परंपरा राखणार?

मुंबई : आयपीएल २०२६ (IPL 2026) मधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध कोलकता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात मुंबईच्या

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हैदराबादवर विक्रमी विजय

बंगळुरू : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपणच चॅम्पियन असल्याच्या थाटात खेळ केला. इंडियन प्रीमिअर लीग २०२६

IPL 2026 : पहिल्या सामन्याआधीच RCB ला धक्का! 'हा' स्टार खेळाडू बाहेर

मुंबई : आयपीएल २०२६ च्या थराराला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात आरसीबी (Royal Challengers Bengaluru) आणि

IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवरून आयपीएल २०२६ श्रीगणेशा! जाणून घ्या RCB vs SRH ची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन

- पहिलाच सामना हायस्कोरिंग होणार ? मुंबई : आजपासून म्हणजेच शनिवार २८ मार्च रोजी आयपीएलच्या १९व्या हंगामाची