प्लास्टिक पिशवीत करायचा लघवी, त्याच हाताने विकायचा फळे, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आरोपीला अटक

  76

डोंबिवली: ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक आरोपी प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करायचा आणि हात न धुता त्याच हाताने फळे विकायचा. इतकंच तो ही पिशवी आपल्या फळांच्या गाडीवरच ठेवयचा आहे. त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात केस दाखल करत त्याला अटक केली आहे.


मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा २० वर्षीय फळ विक्रेत्याचे नाव अली खान असे आहे. व्हिडिओ निळजे भागातील आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २७१, २७२ आणि २९६ अंतर्गत केस दाखल करण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक चांगलेच वैतागले आहेत.


 


याच पद्धतीचे एक प्रकरण उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे समोर आले होते. येथे एक दुकानदार लोकांना ज्यूसमध्ये लघवी मिसळून देत होता. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी ज्यूस विक्रेता आणि त्याच्य १५वर्षीय मुलाला अटक केली होती. पोलिसांनी त्याच्या दुकानाबाहेरून एक लघवीने भरलेला कंटेनरही जप्त केला होता.


आरोपीची ओळख आमिर म्हणून झाली होती. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ज्यूस स्टॉलची पाहणी केली. येथे एका लघवीने भरलेला कॅनही ताब्यात घेतला. जेव्हा त्यांनी याबद्दल विचारले तेव्हा त्याने नीट उत्तर दिले नाही.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली