दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी रिकामी खुर्ची बाजुला ठेवून स्वीकारला पदभार; कारण देत म्हणाल्या..

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी आम आदमी पक्षाने आतिशी मार्लेना यांची अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर एकमुखाने निवड केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्रीपदाचा पदभार आतिशी यांनी स्वीकारला. दरम्यान, आतिशी यांच्या बाजुला पदभार स्वीकारताना एक रिकामी खुर्ची ठेवण्यात आली. त्यामुळे त्यांच्या या कृतीची आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी माध्यमांशी बोलताना यामागचं कारणही सांगितलं आहे.


आतिशी मार्लेना यासंदर्भात मीडियाशी बोलताना म्हणाल्या, ज्याच्याप्रमाणे महाभारतात भरत यांनी प्रभू श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेऊन १४ वर्ष राज्य केलं, त्याचप्रमाणे मीसुद्धा पुढचे चार-पाच महिने सरकार चालवणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या सन्मानार्थ मी हा निर्णय घेतला आहे. पुढे बोलताना म्हणाल्या आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पुन्हा विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मी केवळ आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री असणार आहे. दिल्लीतील जनता या निवडणुकीत पुन्हा आम आदमी पक्षाला बहुमताने निवडून देईल आणि अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असं त्या म्हणाल्या.



भाजपाकडून टीका


दरम्यान, भाजपाने आम आदमी पक्षावर आतिशी यांच्या या निर्णयानंतर जोरदार टीका केलीये. यावरून दिल्लीचे सरकार आतिशी नाही, तर आता अरविंद केजरीवाल रिमोट कंट्रोलद्वारे चालवणार, हे सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री पदाचा हा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया दिल्ली भाजपाच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे.


Comments
Add Comment

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक

गॅस सिलिंडरच्या मागणीत २० ते २२ लाखांनी वाढ

नवी दिल्ली : गॅस तुटवड्यामुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर त्यावर अवलंबून असणारे शेकडो कामगार आणि स्थानिक

मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास नकार, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी रजा अनिवार्य करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे.

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम

चिंता करू नका; भारतात गॅस-इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध - मंत्री हरदीप सिंह पुरी

लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पश्चिम आशियातील संकटानंतर देशात गॅस

तुम्हाला 'या' ५ प्रकारे गॅस सिलेंडर बुक करता येणार; कोणता सर्वात सोपा पर्याय?, जाणून घ्या.

नवी दिल्ली: देशातील लाखो कुटुंबे स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडर वापरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबासाठी