सोयाबीनवर पुन्हा पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट होण्याची शक्यता!

अमरावती : खरीपात अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पेरल्या जाणाऱ्या सोयाबीनवर आता पुन्हा एकदा पिवळ्या मोझॅकसह विषाणूजन्य मोझॅकचा प्रादुर्भाव दिसून आलाय. जिल्ह्यांत या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने सोयाबीन उत्पन्नात जवळपास ७५ टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं. अमरावती जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यात सध्या सोयाबीनवर पिवळ्या मोझॅक चा प्रादुर्भाव आहे.


मागील वर्षी सोयाबीन शेतकऱ्यांना पावसाच्या तऱ्हेमुळे मोठं नुकसान झालं होतं. सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि नंतर अतिवृष्टीमुळे सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकाने माना टाकल्याचे चित्र होते. परिणामी, अजूनही शेतकऱ्यांना सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. आता पुन्हा हा रोग पिकावर पसरला तर यंदाही सोयाबीन धोक्यात येण्याची शक्यता आहे.


पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनची काढणी ही सुरु आहे तर उशीराने पेरा झालेले सोयाबीन अजूनही शेतातच आहे. खरीप घाईंन आणि रब्बीची पेर दमानं.. अस आजही ग्रामीण भागात म्हटलं जातं..हे कशामुळे ते उशीराने पेरणी करणाऱ्यां शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. उशीराने पेरणी झालेले सोयाबीन अजूनही वावरातच आहे तर पहिल्या पेऱ्यातील सोयाबीन हे बाजारात. त्यामुळे मध्यंतरी झालेल्या पावसाचा परिणाम हा या सोयाबीनवर तर झालेलाच आहेच शिवाय आता ‘यलो मोझॅक’ चा प्रादुर्भाव यावर दिसून येत आहे.

Comments
Add Comment

वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉलमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूर : वर्सोवा क्रिस्टल पॉईंट मॉल मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास

ओबीसी समाजासाठी मिनी महामंडळांची स्थापना, मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर :  विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण

मुंबई उपनगरातील 'पागडी' धारकांचा मुद्दा विधानसभेत

​मुंबई शहराचा कायदा उपनगराला लागू करण्याची आमदार मनीषा चौधरी यांनी मागणी​ नागपूर  : ​भाजपच्या आमदार मनीषा चौधरी

दारू दुकानांच्या स्थलांतरासाठी सोसायटीची एनओसी बंधनकारक -उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : राज्यात एफ.एल–२  आणि सी.एल–३  परवानाधारक विदेशी व देशी दारू किरकोळ विक्री केंद्रांच्या स्थलांतरासाठी

बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओची कारवाई

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठी मोहीम राबवणार ठाणे : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, नियमभंग आणि बेशिस्त

'ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक भरती करा'

नागपूर : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांमध्ये जिथे शून्य ते दहा किंवा शून्य वीस विद्यार्थी आहेत अशा अनेक