१३१२ विकेट आणि १० हजाराहून अधिक धावा, ही आहे भारताची सर्वात घातक जोडी

मुंबई: रवीचंद्रन अश्विन, ज्याला पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर मॅन ऑफ द मॅच निवडण्यात आले. अश्विनने पहिल्या सामन्यात एक शतक ठोकले आणि दुसऱ्या डावात ६ विकेटही घेतल्या. दुसरीकडे रवींद्र जडेजाने पहिल्या डावात ८६ धावा खेळण्यासोबतत एकूण सामन्यात ५ विकेटही घेतल्या. हे दोनही खेळाडू गेल्या एका दशकापासून अधिक वेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाची मोठी ताकद बनले आहेत.



एकत्र घेतल्यात १३१२ विकेट


अश्विनबद्दल बोलायचे झाल्यास २०१०मध्ये भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने तीनही फॉरमॅटमधून एकूण २८१ सामने खेळले आहेत. यात त्याने ७४४ विकेट घेतले आहेत. सोबतच अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. घरच्या मैदानावरील क्रिकेटमध्ये भरपूर शतके ठोकण्याशिवाय विकेट काढणाऱ्या अश्विनने भारतासाठीही चांगली कामगिरी केली आहे.


जडेजाने ३४३ सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकूण ५६८ विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच अश्विन आणि जडेजा यांनी मिळून १३१२ विकेट घेतल्या आहेत.



अश्विन-जडेजाची जोडी फलंदाजीतही टॉप क्लास


अश्विन-जडेजाची जोडी गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही भारताची ताकद बनली आहे. अश्विनने आपल्या कसोटी करिअरच्या तिसऱ्या डावातट वेस्ट इंडिजविरुद्ध १०३ धावांची खेळी करत सर्वांना स्तब्ध केले होते. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ शतके आणि १५ अर्धशतके ठोकत ४३१३ धावा केल्या आहेत. जडेजा सध्या कसोटी रेकॉर्डमध्ये अश्विनच्या मागे आहे. मात्र एकूण मिळून त्यांच्या नावावर तीनही फॉरमॅटमध्ये ६३९३ धावा आहेत. अश्विन आणि जडेजाच्या जोडीने बॅटिंगमधून मिळून १०,७०६ धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

कटकमध्ये भारताचा १०१ धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

कटक : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयाने शुभारंभ केला. भारताने कटकमध्ये झालेला सामना १०१

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

IPL 2026 Players Auction : अंतिम यादी जाहीर; ७७ जागांसाठी ३५० खेळाडूंवर बोली, त्यापैकी २४० भारतीय

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचा २०२६ चा खेळाडू लिलाव १६ डिसेंबरला अबुधाबी येथे होणार असून, या वेळी एकूण ३५०

IPL 2026 Auction: टॉप 5 गटात 34 खेळाडूंवर लागणार बोली

IPL 2026 मिनी लिलावासाठी एकूण 350 खेळाडूंची नावं निश्चित करण्यात आलेली आहे . टॉप खेळाडूंसाठी पाच गट करण्यात आले आहेत.

Fruad In Cricket : क्रिकेटविश्वातला महाघोटाळा, एकाच पत्त्यावर आढळले १२ खेळाडू

पुद्दुचेरी : भारतीय क्रिकेटचा जागतिक पातळीवर दबदबा आहेच. बीसीसीआयची आर्थिक ताकद, आयपीएलसारख्या जगातील सर्वात