१३१२ विकेट आणि १० हजाराहून अधिक धावा, ही आहे भारताची सर्वात घातक जोडी

  67

मुंबई: रवीचंद्रन अश्विन, ज्याला पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर मॅन ऑफ द मॅच निवडण्यात आले. अश्विनने पहिल्या सामन्यात एक शतक ठोकले आणि दुसऱ्या डावात ६ विकेटही घेतल्या. दुसरीकडे रवींद्र जडेजाने पहिल्या डावात ८६ धावा खेळण्यासोबतत एकूण सामन्यात ५ विकेटही घेतल्या. हे दोनही खेळाडू गेल्या एका दशकापासून अधिक वेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाची मोठी ताकद बनले आहेत.



एकत्र घेतल्यात १३१२ विकेट


अश्विनबद्दल बोलायचे झाल्यास २०१०मध्ये भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने तीनही फॉरमॅटमधून एकूण २८१ सामने खेळले आहेत. यात त्याने ७४४ विकेट घेतले आहेत. सोबतच अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. घरच्या मैदानावरील क्रिकेटमध्ये भरपूर शतके ठोकण्याशिवाय विकेट काढणाऱ्या अश्विनने भारतासाठीही चांगली कामगिरी केली आहे.


जडेजाने ३४३ सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकूण ५६८ विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच अश्विन आणि जडेजा यांनी मिळून १३१२ विकेट घेतल्या आहेत.



अश्विन-जडेजाची जोडी फलंदाजीतही टॉप क्लास


अश्विन-जडेजाची जोडी गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही भारताची ताकद बनली आहे. अश्विनने आपल्या कसोटी करिअरच्या तिसऱ्या डावातट वेस्ट इंडिजविरुद्ध १०३ धावांची खेळी करत सर्वांना स्तब्ध केले होते. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ शतके आणि १५ अर्धशतके ठोकत ४३१३ धावा केल्या आहेत. जडेजा सध्या कसोटी रेकॉर्डमध्ये अश्विनच्या मागे आहे. मात्र एकूण मिळून त्यांच्या नावावर तीनही फॉरमॅटमध्ये ६३९३ धावा आहेत. अश्विन आणि जडेजाच्या जोडीने बॅटिंगमधून मिळून १०,७०६ धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी