१३१२ विकेट आणि १० हजाराहून अधिक धावा, ही आहे भारताची सर्वात घातक जोडी

  81

मुंबई: रवीचंद्रन अश्विन, ज्याला पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर मॅन ऑफ द मॅच निवडण्यात आले. अश्विनने पहिल्या सामन्यात एक शतक ठोकले आणि दुसऱ्या डावात ६ विकेटही घेतल्या. दुसरीकडे रवींद्र जडेजाने पहिल्या डावात ८६ धावा खेळण्यासोबतत एकूण सामन्यात ५ विकेटही घेतल्या. हे दोनही खेळाडू गेल्या एका दशकापासून अधिक वेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाची मोठी ताकद बनले आहेत.



एकत्र घेतल्यात १३१२ विकेट


अश्विनबद्दल बोलायचे झाल्यास २०१०मध्ये भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने तीनही फॉरमॅटमधून एकूण २८१ सामने खेळले आहेत. यात त्याने ७४४ विकेट घेतले आहेत. सोबतच अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. घरच्या मैदानावरील क्रिकेटमध्ये भरपूर शतके ठोकण्याशिवाय विकेट काढणाऱ्या अश्विनने भारतासाठीही चांगली कामगिरी केली आहे.


जडेजाने ३४३ सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकूण ५६८ विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच अश्विन आणि जडेजा यांनी मिळून १३१२ विकेट घेतल्या आहेत.



अश्विन-जडेजाची जोडी फलंदाजीतही टॉप क्लास


अश्विन-जडेजाची जोडी गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही भारताची ताकद बनली आहे. अश्विनने आपल्या कसोटी करिअरच्या तिसऱ्या डावातट वेस्ट इंडिजविरुद्ध १०३ धावांची खेळी करत सर्वांना स्तब्ध केले होते. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ शतके आणि १५ अर्धशतके ठोकत ४३१३ धावा केल्या आहेत. जडेजा सध्या कसोटी रेकॉर्डमध्ये अश्विनच्या मागे आहे. मात्र एकूण मिळून त्यांच्या नावावर तीनही फॉरमॅटमध्ये ६३९३ धावा आहेत. अश्विन आणि जडेजाच्या जोडीने बॅटिंगमधून मिळून १०,७०६ धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

Asia Cup 2025 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह सुपर-४ मध्ये प्रवेश; जपानवर मात

पाटणा : भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. रंगतदार लढतीत भारतीय

रोहित शर्मासह ६ क्रिकेटपटूंची सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी होणार

बंगळुरु : रोहित शर्मा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

टी-२० विश्वचषक २०२६ साठी महेंद्रसिंग धोनी पुन्हा टीम इंडियाचा 'मेंटॉर'? बीसीसीआयने दिली ऑफर!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी टीम इंडियाच्या मेंटरपदाची

Asia Cup 2025 च्या सामन्यांच्या वेळेत बदल! भारत-पाकिस्तान सामना आता कधी सुरू होणार?

नवी दिल्ली: आगामी आशिया कप २०२५ सुरू होण्याआधीच क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेतील

राहुल द्रविडचा धक्कादायक निर्णय! राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदाचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू, माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच थांबला

पॅरिस : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचे जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप