१३१२ विकेट आणि १० हजाराहून अधिक धावा, ही आहे भारताची सर्वात घातक जोडी

मुंबई: रवीचंद्रन अश्विन, ज्याला पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर मॅन ऑफ द मॅच निवडण्यात आले. अश्विनने पहिल्या सामन्यात एक शतक ठोकले आणि दुसऱ्या डावात ६ विकेटही घेतल्या. दुसरीकडे रवींद्र जडेजाने पहिल्या डावात ८६ धावा खेळण्यासोबतत एकूण सामन्यात ५ विकेटही घेतल्या. हे दोनही खेळाडू गेल्या एका दशकापासून अधिक वेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाची मोठी ताकद बनले आहेत.



एकत्र घेतल्यात १३१२ विकेट


अश्विनबद्दल बोलायचे झाल्यास २०१०मध्ये भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने तीनही फॉरमॅटमधून एकूण २८१ सामने खेळले आहेत. यात त्याने ७४४ विकेट घेतले आहेत. सोबतच अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. घरच्या मैदानावरील क्रिकेटमध्ये भरपूर शतके ठोकण्याशिवाय विकेट काढणाऱ्या अश्विनने भारतासाठीही चांगली कामगिरी केली आहे.


जडेजाने ३४३ सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकूण ५६८ विकेट घेतल्या आहेत. म्हणजेच अश्विन आणि जडेजा यांनी मिळून १३१२ विकेट घेतल्या आहेत.



अश्विन-जडेजाची जोडी फलंदाजीतही टॉप क्लास


अश्विन-जडेजाची जोडी गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही भारताची ताकद बनली आहे. अश्विनने आपल्या कसोटी करिअरच्या तिसऱ्या डावातट वेस्ट इंडिजविरुद्ध १०३ धावांची खेळी करत सर्वांना स्तब्ध केले होते. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ शतके आणि १५ अर्धशतके ठोकत ४३१३ धावा केल्या आहेत. जडेजा सध्या कसोटी रेकॉर्डमध्ये अश्विनच्या मागे आहे. मात्र एकूण मिळून त्यांच्या नावावर तीनही फॉरमॅटमध्ये ६३९३ धावा आहेत. अश्विन आणि जडेजाच्या जोडीने बॅटिंगमधून मिळून १०,७०६ धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

शुभमन गिल बाहेर; साई सुदर्शनला मिळणार कसोटीची संधी

गुवाहाटी : पहिल्या कसोटी दरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीनंतर शुभमन गिलची मैदानात पुनरागमन करण्याची शक्यता कमी

भारताचा आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश

दोहा : भारताने आपला दुसरा सामना जिंकून आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोहा स्टेडियमवर

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.