नवी मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! आता ठाणे-बेलापूर प्रवास होणार सुपरफास्ट

तयार होतोय नवा पूल; वाहतूक कोंडीतूनही सुटका


नवी मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात प्रशासनाकडून (Administration) अनेक विकासाची कामे हाती घेण्यात आली आहे. राज्यात मोठमोठ्या महामार्गांची कामे सुरू आहेत. मुंबई, नवी मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये विविध रस्ते विकासाच्या मोठ-मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुसाट होत असून वाहतूक कोंडीतून देखील सुटका होत आहे. अशातच आता नवी मुंबईकरांचाही (Navi Mumbai) ठाणे ते बेलापूर प्रवास जलद गतीने पार पडणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेने ठाणे-बेलापूर रोडवरून कोपरखैरणे आणि घणसोलीपर्यंत पोहचण्यासाठी नवा पूल तयार करण्याची योजना आखली आहे. या योजनेद्वारे वाहन चालक टीबी रोडवरुन बेलापूर ते ठाण्याच्या दिशेला जाताना नोटवरून जाऊ शकणार आहेत. तसेच धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीसोबत (DAKC) टीबी रोडवरील उड्डाणपूलानंतर सुरू होणाऱ्या आर्म ब्रिजवरून जाऊन ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर जाऊ शकणार आहेत. यामुळे वाहनचालकांचा प्रवास अगदी सुखकर आणि सुसाट होणार आहे.


दरम्यान, या पूलासाठी तब्बल २४.२३ कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे. हा प्रोजेक्ट नोड्सवर वाहतूक प्रवाह सुलभ करण्यात मदत करेल.


सध्या कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळ फक्त एक अरुंद भुयारी मार्ग आहे ज्याचा वापर वाहनधारक कोपरखैरणे नोडमध्ये जाण्यासाठी करतात आणि टीबी रोडवरील ठाण्याकडे जाणाऱ्या गल्लीतून घणसोली गावाला जोडणारा जुना रस्त्याचा वापर करतात. मात्र यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आह. त्यामुळे एक आर्म ब्रिज बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. याबाबत निविदा मागवण्यात आल्या असून त्याचे सबमिशन महिना संपण्यापूर्वी कराव्या लागतात. त्यानंतर काम लवकरात लवकर काम पूर्ण केले जाईल, असे नवी मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता शिरीष अरदवाड यांनी सांगितले.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य