नवी मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! आता ठाणे-बेलापूर प्रवास होणार सुपरफास्ट

तयार होतोय नवा पूल; वाहतूक कोंडीतूनही सुटका


नवी मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात प्रशासनाकडून (Administration) अनेक विकासाची कामे हाती घेण्यात आली आहे. राज्यात मोठमोठ्या महामार्गांची कामे सुरू आहेत. मुंबई, नवी मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये विविध रस्ते विकासाच्या मोठ-मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुसाट होत असून वाहतूक कोंडीतून देखील सुटका होत आहे. अशातच आता नवी मुंबईकरांचाही (Navi Mumbai) ठाणे ते बेलापूर प्रवास जलद गतीने पार पडणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेने ठाणे-बेलापूर रोडवरून कोपरखैरणे आणि घणसोलीपर्यंत पोहचण्यासाठी नवा पूल तयार करण्याची योजना आखली आहे. या योजनेद्वारे वाहन चालक टीबी रोडवरुन बेलापूर ते ठाण्याच्या दिशेला जाताना नोटवरून जाऊ शकणार आहेत. तसेच धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीसोबत (DAKC) टीबी रोडवरील उड्डाणपूलानंतर सुरू होणाऱ्या आर्म ब्रिजवरून जाऊन ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर जाऊ शकणार आहेत. यामुळे वाहनचालकांचा प्रवास अगदी सुखकर आणि सुसाट होणार आहे.


दरम्यान, या पूलासाठी तब्बल २४.२३ कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे. हा प्रोजेक्ट नोड्सवर वाहतूक प्रवाह सुलभ करण्यात मदत करेल.


सध्या कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळ फक्त एक अरुंद भुयारी मार्ग आहे ज्याचा वापर वाहनधारक कोपरखैरणे नोडमध्ये जाण्यासाठी करतात आणि टीबी रोडवरील ठाण्याकडे जाणाऱ्या गल्लीतून घणसोली गावाला जोडणारा जुना रस्त्याचा वापर करतात. मात्र यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आह. त्यामुळे एक आर्म ब्रिज बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. याबाबत निविदा मागवण्यात आल्या असून त्याचे सबमिशन महिना संपण्यापूर्वी कराव्या लागतात. त्यानंतर काम लवकरात लवकर काम पूर्ण केले जाईल, असे नवी मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता शिरीष अरदवाड यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी