नवी मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! आता ठाणे-बेलापूर प्रवास होणार सुपरफास्ट

  114

तयार होतोय नवा पूल; वाहतूक कोंडीतूनही सुटका


नवी मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात प्रशासनाकडून (Administration) अनेक विकासाची कामे हाती घेण्यात आली आहे. राज्यात मोठमोठ्या महामार्गांची कामे सुरू आहेत. मुंबई, नवी मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये विविध रस्ते विकासाच्या मोठ-मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुसाट होत असून वाहतूक कोंडीतून देखील सुटका होत आहे. अशातच आता नवी मुंबईकरांचाही (Navi Mumbai) ठाणे ते बेलापूर प्रवास जलद गतीने पार पडणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेने ठाणे-बेलापूर रोडवरून कोपरखैरणे आणि घणसोलीपर्यंत पोहचण्यासाठी नवा पूल तयार करण्याची योजना आखली आहे. या योजनेद्वारे वाहन चालक टीबी रोडवरुन बेलापूर ते ठाण्याच्या दिशेला जाताना नोटवरून जाऊ शकणार आहेत. तसेच धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीसोबत (DAKC) टीबी रोडवरील उड्डाणपूलानंतर सुरू होणाऱ्या आर्म ब्रिजवरून जाऊन ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर जाऊ शकणार आहेत. यामुळे वाहनचालकांचा प्रवास अगदी सुखकर आणि सुसाट होणार आहे.


दरम्यान, या पूलासाठी तब्बल २४.२३ कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे. हा प्रोजेक्ट नोड्सवर वाहतूक प्रवाह सुलभ करण्यात मदत करेल.


सध्या कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळ फक्त एक अरुंद भुयारी मार्ग आहे ज्याचा वापर वाहनधारक कोपरखैरणे नोडमध्ये जाण्यासाठी करतात आणि टीबी रोडवरील ठाण्याकडे जाणाऱ्या गल्लीतून घणसोली गावाला जोडणारा जुना रस्त्याचा वापर करतात. मात्र यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आह. त्यामुळे एक आर्म ब्रिज बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. याबाबत निविदा मागवण्यात आल्या असून त्याचे सबमिशन महिना संपण्यापूर्वी कराव्या लागतात. त्यानंतर काम लवकरात लवकर काम पूर्ण केले जाईल, असे नवी मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता शिरीष अरदवाड यांनी सांगितले.

Comments
Add Comment

तुकाराम मुंढेंची २३वी बदली दिव्यांग कल्याण विभागात

मुंबई  : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम

Kajol Honoured With Maharashtra State Film Awards : “आईच्या साडीचा अभिमान… पुरस्कार स्विकारताना काजोल भावूक”, काजोलचं मराठी भाषण ठरलं खास आकर्षण

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला मुंबईत पार पडलेल्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात

दूध भेसळीचे प्रमाण कमी करण्यासाठी दूध स्कॅनर

मुंबई (वार्ताहर) : दूध भेसळीमुळे सर्वसामान्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे रोखण्यासाठी

सणासुदीच्या हंगामात नारळ, डाळींचे चढे दर

मुंबई (वार्ताहर) :सध्या सणांचा काळ सुरु झाल्यामुळे डाळी तसेच नारळाचा वापर धार्मिक विधी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी

एसटी महामंडळ यात्री अ‍ॅप चालवणार

मुंबई (प्रतिनिधी) : चालकाला सन्मानजनक मोबदला व प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या