दळभद्री राजकारणाने नेतेमंडळी अडचणीत

दीपक मोहिते


मुंबई: जातीपाती व धर्माचे राजकारण करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना त्यांच्या या दळभद्री राजकारणाने आता चांगलेच अडचणीत आणले आहे. मराठा विरुद्ध ओबीसी व आदिवासी विरुद्ध धनगर,या समाजामध्ये भिंती उभारण्याचे काम,ज्या नेत्यांनी केले त्यांना लोकसभा निवडणुकीत विशिष्ट समाजाने चांगलाच हिसका दाखवला होता. त्या दणक्यानंतर तरी हे दळभद्री राजकारणी आपल्या वागण्यात सुधारणा करतील,अशी अपेक्षा होती. पण अंतरवाली सराटी व वडगोद्री या गावात तसेच मुंबईतील धारावी येथे जे काही चालले आहे,ते दंगलीना आमंत्रण देण्यासारखे आहे.


वास्तविक रस्ते बंद करणे,दगडफेक करणे,असे प्रकार करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. पण गृहखात्याने त्यांना तमाशाई बनवून ठेवले आहे. धनगर समाजाने देखील आंदोलन छेडल्यामुळे राज्यातील आदिवासी संघटना आता धनगर समाजाविरोधात एल्गार पुकारण्याच्या तयारीत आहेत. बोईसर पूर्व भागात चिल्हार फाटा येथे या संघटनांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. समाजात तेढ निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याला सरकारने वेळीच आवर घातला नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.


कोण गुलाबी जॅकेट्स घालून मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इव्हेंट्स करण्यात मश्गुल आहेत. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री हे केवळ बघ्याची भूमिका घेत फुकटचे सल्ले देत फिरत आहेत. राज्याची प्रशासकीय यंत्रणा पार कोलमडली असून कोणाचा पायपोसं कोणाच्या पायात नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या राजकारण्यांनी मग ते सत्ताधारी असोत की विरोधक, त्यांनी कितीही पैशांची खिरापत वाटली तरी मतदार या निवडणुकीत या मतलबी नेत्यांना नक्कीच बाय बाय करणार आहेत.

Comments
Add Comment

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे