BSNL ने Jio, Airtel आणि Vi सगळ्यांना टाकले मागे, याबाबतीत बनली नंबर १

Share

मुंबई: बीएसएनएलच्या सध्या बऱ्याच चर्चा ऐकायला मिळत आहे. खरंतर, जुलै २०२४मध्ये जेव्हापासून रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाने आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. तेव्हापासून बीएसएनएलबद्दल खूप चर्चा केली जात आहे. आता बीएसएनएलने आणखी एका बाबतीत सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांना मागे सोडले आहे.

BSNL चा जलवा

खाजगी कंपन्यांकडून रिचार्ज प्लान्सचे दर ३० टक्क्यांनी वाढवल्यानंतर आता लोकांनी सोशल मीडियावर असे म्हणणे सुरू केले आहे की आता त्यांच्याकडे बीसएसएनएल हा एकमेव पर्याय राहिला आहे. लोक तर बीएसएनएलमध्ये आपला नंबर पोर्ट करण्याबाबतही बोलत आहेत. आंध्र प्रदेशातील राज्यांमधील अनेक जणांनी आपापले नंबर्स बीएसएनएलमध्ये पोर्टही केले होते. तसेच अनेक युजर्स बीएसएनएलमध्ये सामील झाले आहेत.

याबाबतीत टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAIने जुलै महिन्यात एक डेटा जारी केला आहे. यात तुम्हाला सर्व काही समजेल. या डेटानुसार जुलैच्या महिन्यात वायरलेस सबस्क्रायबर्सची संख्या कमी होऊन १२०.५१७ कोटी झाली होती. तर जून महिन्यात ही संख्या १२०.५६४ कोटी झाली होती.

ट्रायच्या डेटानुसार खाजगी कंपन्यांनी रिचार्ज प्लान्सचे दर वाढवल्यानंतर जुलैमध्ये सर्वाधिक नुकसान एअरटेलला झाले होते. भारती एअरटेलने १६.९ लाख युजर्स गमावले होते. तर वोडाफोन आयडियाने १४.१ लाख युजर्स गमावले होते. तर तिसऱ्या स्थानावर रिलायन्स जिओ होते. त्यांनी ७.५८ लाख युजर्स गमावले होते.

दुसरीकडे जुलै महिन्यात भारतातील एकमेव टेलिकॉम कंपनी अशी होती की ज्यांना ग्राहकांच्या बाबतीत नुकसान नव्हे तर फायदा झाला होता. जुलैमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या वाढली होती. खाजगी कंपन्यांनी रिचार्ज प्लान्सचे दर वाढवल्यानंतर देशभरात २९.४ लाख ग्राहक जोडले गेले होते.

Recent Posts

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

33 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago