अमरावतीच्या एसडीओ कार्यालयात शेतकऱ्याने घेतला विषाचा घोट!

भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्याने टोकाचे पाऊल


अमरावती : अमरावतीमधील उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांच्या समक्ष त्यांच्या कार्यालयात विषारी द्रव्य प्राशन करून एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि. २०) दुपारी साडेतीन वाजता घडली. अनेक दिवसांपासून शेती अधिग्रहणाचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. दिलीप तुळशीराम ढगे (५२, रा. उजोना, ता. दारव्हा) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.


प्राप्त माहितीनुसार, दिलीप ढगे यांच्यासह एकूण १४ वारसांच्या नावावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सालोड येथील ६.७४ हेक्टर आर शेत जमीन चांदी नदी प्रकल्पाकरिता संपादित केली आहे. परंतु, या प्रकरणात आपसी विवादामुळे संबंधित भूधारकांना मोबदल्याची रक्कम देण्यात आली नव्हती. मात्र, सर्व व्यवस्थित झाल्यानंतर जमिनीच्या भूसंपादनाच्या मोबदल्याची रक्कम मिळण्यासाठी रामकृष्ण ढगे वारंवार चकरा मारूनही समाधानकारक उत्तर नाही १६ ऑगस्टला उपविभागीय अधिकाऱ्यांनी आवश्यक दस्तावेजांसह शेतजमिनीशी संबंधितांना बोलावले होते. आम्ही सर्व एसडीओ कार्यालयात हजर होतो. मात्र, एसडीओ कोरे कार्यालयात नसल्याने सुनावणी झाली नाही. त्यानंतरही दिलीप ढगे व इतरांनी सुनावणीच्या तारखेसाठी वारंवार एसडीओ कार्यालयात चकरा मारल्या. याप्रकरणी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने दिलीप ढगे यांनी टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती दिलीप ढगे यांचे बंधू जगदीश ढगे यांनी दिली.


कागदपत्रांचा अभाव होता


ईलेक्शन ड्युटीवर असलेल्या एका स्थानिक नायब तहसीलदारांचा अपघात झाल्यामुळे मी रुग्णालयात गेले होते. त्यामुळे सुनावणीला हजर राहू शकली नाही. मात्र, त्यांच्या प्रकरणात मूळ कागदपत्रांचा अजूनही अभाव आहे, असे चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत