Tirupati Prasad : तिरुपतीच्या लाडू प्रसादात मांसाहाराचा समावेश; होणार कडक चौकशी!

चंद्राबाबूंच्या आरोपांची केंद्राकडून गंभीर दखल


नवी दिल्ली : तिरुपती (Tirupati Balaji) देवस्थानातील प्रसादाच्या लाडूंमध्ये (Laddu Prasad) जनावरांच्या चरबीचा वापर झाल्याच्या गंभीर आरोप करण्यात आला आहे. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी शुक्रवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली. त्यांनी प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी आणि इतर कमी दर्जाच्या घटकांच्या कथित वापरासंदर्भात अहवाल मागवला आहे.


तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत होता, असा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यावर केला आहे. दरम्यान, जगनमोहन रेड्डी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. पण यावरुन आंध्र प्रदेशात वाद पेटला आहे.



जेपी नड्डा यांच्याकडून कारवाईचा इशारा


या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी याबाबत माहिती मिळाल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली. नेमके काय झाले आहे? याबाबत त्यांच्याकडून तपशील जाणून घेतला. मी त्यांना उपलब्ध असलेला अहवाल देण्यास सांगितले आहे; जेणेकरून आम्ही त्याचे परीक्षण करू. मी राज्यातील नियामकांशीही बोलू. नियामक आणि अन्न सुरक्षा मानकांनुसार योग्य कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अहवालाची सखोल परीक्षण करेल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल, असेही जेपी नड्डा यांनी म्हटले आहे.



‘अन्नदानम’चा दर्जा खालावल्याचा आरोप


मागील ५ वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेत होता तेव्हा त्यांनी देवस्थानचे पावित्र्य घालवले. ‘अन्नदानम’ अर्थात अन्नदानाच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद मानले जातात. या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला, असा आरोप नायडू यांनी केला आहे.

Comments
Add Comment

Pune Crime : हॉटेलच्या बंद खोल्यांत चालले होत 'ते' कांड, पुणे पोलिसांची छापा पडताच खळबळ

पुणे : पुणे (Pune) शहर गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने (AHTC) शिवाजीनगर (Shivaji Nagar) परिसरात मोठी कारवाई करत दोन

ST Bus : बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर लगाम

१५ दिवसांत एसटीच्या उत्पन्नात ४३.८३ कोटी रुपयांची वाढ मुंबई, दि. १८ : राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर

RBI Recruitment 2026 : आरबीआयमध्ये तरुणांना सुवर्णसंधी; दरमहा मिळणार तब्बल १.५ लाखांचा पगार, जाणून घ्या क सा करायचा अर्ज?

मुंबई : देशातील तरुण आणि होतकरू पदवीधरांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक अतिशय सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.

Weather Alert: मान्सूनची प्रतीक्षा कायम! पुढील ४८ तास महत्त्वाचे, हवामान खात्याने दिला इशारा

मुंबई : जून (June) महिन्याचा अर्धा टप्पा संपत आला असला तरी महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून (Monsoon) अद्याप पूर्णपणे सक्रिय

Baramati Bus Fire : धावत्या बसमधून धूर, अन् काही क्षणांत आग; बारामतीतील थरारक घटना

बारामती : पुण्यातील बारामती (Baramati) तालुक्यातील पणदरे खिंडीत आज सकाळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. निरा-बारामती

Dhule-Solapur highway : भरधाव कारने दुचाकीला उडवले; १९ वर्षीय तरुण गंभीर जखमी

आडूळ (ता. पैठण): धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडूळ फाटा येथे बुधवारी (दि. १७) दुपारी भरधाव कारने दुचाकीला