Jalna Accident : भीषण अपघात! जालना-बीड मार्गावर एसटी बस-ट्रकची जोरदार धडक; गाड्यांचा चक्काचूर

६ जणांचा मृत्यू, १८ प्रवासी जखमी


जालना : जालना येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालना ते बीड मार्गावर एसटी बस आणि ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Jalna Accident) झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.


आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास जालना वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसला मोसंबी फळाची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने समोरासमोर एकमेकांना धडकताच मोठा आवाज झाला. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.


प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, आयशर ट्रक भरधाव वेगात होता. एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात तो समोरून येणाऱ्या बसला जाऊन धडकल्यामुळे भीषण अपघात घडला. दरम्यान, या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून १८ प्रवासी जखमी झाले आहेत.


त्याचबरोबर किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच इतर जखमी व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : ऑगस्टअखेर पावसाची सुट्टी? महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल; जाणून घ्या आजचं अपडेट

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल जाणवत असून, राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाल्याचे चित्र आहे.

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या