Jalna Accident : भीषण अपघात! जालना-बीड मार्गावर एसटी बस-ट्रकची जोरदार धडक; गाड्यांचा चक्काचूर

६ जणांचा मृत्यू, १८ प्रवासी जखमी


जालना : जालना येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालना ते बीड मार्गावर एसटी बस आणि ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Jalna Accident) झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.


आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास जालना वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसला मोसंबी फळाची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने समोरासमोर एकमेकांना धडकताच मोठा आवाज झाला. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.


प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, आयशर ट्रक भरधाव वेगात होता. एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात तो समोरून येणाऱ्या बसला जाऊन धडकल्यामुळे भीषण अपघात घडला. दरम्यान, या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून १८ प्रवासी जखमी झाले आहेत.


त्याचबरोबर किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच इतर जखमी व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा

राज्यातील सरकारी शाळेत मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण

गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने

भाजपाचे विकासाचे, याउलट काँग्रेसचे विनाशाचे राजकारण - बावनकुळे

नागपूर : भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच जनसेवकाच्या भूमिकेतून विकासाचे राजकारण केले आहे. काँग्रेसने

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे पर्यटक तरुणी ४० फूट खोल दरीत कोसळली

राजगड : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे पर्यटकांची पळापळ झाली.

जमीन मोजणी आता होणार केवळ ३० दिवसांत !

सरकारने अधिसूचना जारी केल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जमीन

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; पहा आपल्या तालुक्यातील शेतक-यांना काय मिळालं?

२५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा