Jalna Accident : भीषण अपघात! जालना-बीड मार्गावर एसटी बस-ट्रकची जोरदार धडक; गाड्यांचा चक्काचूर

६ जणांचा मृत्यू, १८ प्रवासी जखमी


जालना : जालना येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालना ते बीड मार्गावर एसटी बस आणि ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Jalna Accident) झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.


आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास जालना वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसला मोसंबी फळाची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने समोरासमोर एकमेकांना धडकताच मोठा आवाज झाला. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.


प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, आयशर ट्रक भरधाव वेगात होता. एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात तो समोरून येणाऱ्या बसला जाऊन धडकल्यामुळे भीषण अपघात घडला. दरम्यान, या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून १८ प्रवासी जखमी झाले आहेत.


त्याचबरोबर किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच इतर जखमी व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा