Jalna Accident : भीषण अपघात! जालना-बीड मार्गावर एसटी बस-ट्रकची जोरदार धडक; गाड्यांचा चक्काचूर

  117

६ जणांचा मृत्यू, १८ प्रवासी जखमी


जालना : जालना येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालना ते बीड मार्गावर एसटी बस आणि ट्रकची जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Jalna Accident) झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.


आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास जालना वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ गेवराईकडून अंबडकडे जाणाऱ्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसला मोसंबी फळाची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने समोरासमोर एकमेकांना धडकताच मोठा आवाज झाला. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.


प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, आयशर ट्रक भरधाव वेगात होता. एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात तो समोरून येणाऱ्या बसला जाऊन धडकल्यामुळे भीषण अपघात घडला. दरम्यान, या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून १८ प्रवासी जखमी झाले आहेत.


त्याचबरोबर किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच इतर जखमी व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या