लालबागच्या राजाचरणी गणेशोत्सवात भक्तांकडून कोट्यावधींचे दान

मुंबई: मुंबईचा गणेशोत्सव म्हटले की लालबागच्या राजाचे नाव पहिले तोंडावर येते. लालबागचा राजा, नवसाला पावणारा राजा अशी या गणपतीची ओळख आहे. त्यामुळे देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भक्तगण आपल्या लाडक्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात.


गणपतीच्या दहा दिवसांत तर लालबागच्या राजाच्या दरबारात भक्तांची प्रचंड गर्दी असते. दररोज लाखो भाविक राजाचे दर्शन घेतात. तितकेच भरभरून दानही आपल्या राजासाठी अर्पण करतात. दहा दिवसांमध्ये राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या इतकी प्रचंड असते की अनेकदा गर्दीवर नियंत्रण मिळवता येत नाही.


दरम्यान, यंदाची राजाच्या चरणी भक्तांकडून भरभरून दान करण्यात आले आहे. ७ सप्टेंबरला गणपती विराजमान झाले.


गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत लालबागच्या राजाला ५ कोटी ६५ लाख ९० हजार रोख रुपये दान करण्यात आले आहेत. ही केवळ रोख रक्कम आहे. सोने-चांदीचीही मोठ्या प्रमाणात भक्तांकडून दान करण्यात आले आहे.


गणपतीच्या दहा दिवसांमध्ये भक्तांनी तब्बल ४१५१.३६ ग्रॅम सोने राजासाठी अर्पण केले. तर ६४३२१ ग्रॅम चांदी लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आली.

Comments
Add Comment

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे

मिठी नदी, नालेसफाईच्या कामांबाबत गैरप्रकार झाल्यास थेट कारवाई; महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला इशारा

मुंबई: नालेसफाईच्या संपूर्ण प्रक्रियेवर अभियंत्यांचे वैयक्तिक लक्ष असणे आवश्यक आहे. तसेच नालेसफाईच्या