India vs Bangladesh: बांगलादेशविरुद्ध कसोटीत जसप्रीत बुमराहने रचला इतिहास

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदम्बरम क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू आहे. या कसोटी सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.


भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या संघाला १४९ धावांवर रोखत आपल्या संघाला २२७ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात ४ विकेट घेत त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४०० विकेट पूर्ण केल्या.. बुमराहने कमी डावांमध्ये ४०० विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहने केवळ २२७ डावांमध्ये ४०० विकेट मिळवल्या.


एकूण मिळून बुमराह सहावा वेगवान गोलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी ४०० विकेट मिळवल्या आहेत. याआधी ५ भारतीय वेगवान गोलंदाजांनी ४००चा आकडा पार केला आहे.


यात कपिल देव ६८७ विकेट(४४८ डाव), झहीर खान ५९७(३७३ डाव), जवागल श्रीनाथ ५५१ (३४८ डाव), मोहम्मद शमी ४४८ विकेट(२४५ डाव), इशांत शर्मा ४३४ विकेट(२८० डाव) यांचा समावेश आहे.


बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात बुमराहने शादमान इस्लाम(२), मुशफिकुर रहीम(८), हसन महमूद(९) आणि तस्कीन अहमद(११) यांना बाद केले.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहच्या नावावर ४०१ विकेट आहेत. बुमराहने ८९ वनडेमध्ये १४९ विकेट, ७० टी-२०मध्ये ८९ विकेट, तर ३६ कसोटीत १६३ विकेट घेतल्या आहेत.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना