India vs Bangladesh: बांगलादेशविरुद्ध कसोटीत जसप्रीत बुमराहने रचला इतिहास

  68

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदम्बरम क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू आहे. या कसोटी सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.


भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या संघाला १४९ धावांवर रोखत आपल्या संघाला २२७ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात ४ विकेट घेत त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४०० विकेट पूर्ण केल्या.. बुमराहने कमी डावांमध्ये ४०० विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहने केवळ २२७ डावांमध्ये ४०० विकेट मिळवल्या.


एकूण मिळून बुमराह सहावा वेगवान गोलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी ४०० विकेट मिळवल्या आहेत. याआधी ५ भारतीय वेगवान गोलंदाजांनी ४००चा आकडा पार केला आहे.


यात कपिल देव ६८७ विकेट(४४८ डाव), झहीर खान ५९७(३७३ डाव), जवागल श्रीनाथ ५५१ (३४८ डाव), मोहम्मद शमी ४४८ विकेट(२४५ डाव), इशांत शर्मा ४३४ विकेट(२८० डाव) यांचा समावेश आहे.


बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात बुमराहने शादमान इस्लाम(२), मुशफिकुर रहीम(८), हसन महमूद(९) आणि तस्कीन अहमद(११) यांना बाद केले.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहच्या नावावर ४०१ विकेट आहेत. बुमराहने ८९ वनडेमध्ये १४९ विकेट, ७० टी-२०मध्ये ८९ विकेट, तर ३६ कसोटीत १६३ विकेट घेतल्या आहेत.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला