India vs Bangladesh: बांगलादेशविरुद्ध कसोटीत जसप्रीत बुमराहने रचला इतिहास

  72

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदम्बरम क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू आहे. या कसोटी सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.


भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या संघाला १४९ धावांवर रोखत आपल्या संघाला २२७ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात ४ विकेट घेत त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४०० विकेट पूर्ण केल्या.. बुमराहने कमी डावांमध्ये ४०० विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहने केवळ २२७ डावांमध्ये ४०० विकेट मिळवल्या.


एकूण मिळून बुमराह सहावा वेगवान गोलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी ४०० विकेट मिळवल्या आहेत. याआधी ५ भारतीय वेगवान गोलंदाजांनी ४००चा आकडा पार केला आहे.


यात कपिल देव ६८७ विकेट(४४८ डाव), झहीर खान ५९७(३७३ डाव), जवागल श्रीनाथ ५५१ (३४८ डाव), मोहम्मद शमी ४४८ विकेट(२४५ डाव), इशांत शर्मा ४३४ विकेट(२८० डाव) यांचा समावेश आहे.


बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात बुमराहने शादमान इस्लाम(२), मुशफिकुर रहीम(८), हसन महमूद(९) आणि तस्कीन अहमद(११) यांना बाद केले.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहच्या नावावर ४०१ विकेट आहेत. बुमराहने ८९ वनडेमध्ये १४९ विकेट, ७० टी-२०मध्ये ८९ विकेट, तर ३६ कसोटीत १६३ विकेट घेतल्या आहेत.

Comments
Add Comment

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील बोम्मासंद्राच्या सूर्या सिटीमध्ये एक भव्य

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडणार?

चेन्नईकडून खेळण्याची शक्यता, अश्विनही संघातून बाहेर पडण्याच्या विचारात चेन्नई  : संजू सॅमसनने राजस्थान

'या' पाकिस्तानी क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपात ब्रिटनमध्ये अटक

नवी दिल्ली: पाकिस्तानचा २४ वर्षीय क्रिकेटर हैदर अलीला बलात्कार प्रकरणात ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे.

आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाची माघार; भारतात येऊन खेळण्यास नकार

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी