India vs Bangladesh: बांगलादेशविरुद्ध कसोटीत जसप्रीत बुमराहने रचला इतिहास

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदम्बरम क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू आहे. या कसोटी सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.


भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या संघाला १४९ धावांवर रोखत आपल्या संघाला २२७ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात ४ विकेट घेत त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४०० विकेट पूर्ण केल्या.. बुमराहने कमी डावांमध्ये ४०० विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहने केवळ २२७ डावांमध्ये ४०० विकेट मिळवल्या.


एकूण मिळून बुमराह सहावा वेगवान गोलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी ४०० विकेट मिळवल्या आहेत. याआधी ५ भारतीय वेगवान गोलंदाजांनी ४००चा आकडा पार केला आहे.


यात कपिल देव ६८७ विकेट(४४८ डाव), झहीर खान ५९७(३७३ डाव), जवागल श्रीनाथ ५५१ (३४८ डाव), मोहम्मद शमी ४४८ विकेट(२४५ डाव), इशांत शर्मा ४३४ विकेट(२८० डाव) यांचा समावेश आहे.


बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात बुमराहने शादमान इस्लाम(२), मुशफिकुर रहीम(८), हसन महमूद(९) आणि तस्कीन अहमद(११) यांना बाद केले.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहच्या नावावर ४०१ विकेट आहेत. बुमराहने ८९ वनडेमध्ये १४९ विकेट, ७० टी-२०मध्ये ८९ विकेट, तर ३६ कसोटीत १६३ विकेट घेतल्या आहेत.

Comments
Add Comment

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ

‘गचाळ क्षेत्ररक्षणामुळे मालिका गमाविली’

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना