Indian Railway News: धक्कादायक! कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन धावली उलट्या दिशेने

कोलकाता : जगामध्ये रेल्वे नेटवर्कपैकी एक असलेल्या भारतीय रेल्वेमधून (Indian Railway) दररोज कोट्यवधीनी लोक प्रवास करत असतात. भारतामधील रेल्वे हे प्रवासाचं एक स्वस्त आणि सुरक्षित माध्यम मानलं जातं. मात्र काही घटना अशासुद्धा घडत असतात. ज्याच्यामुळे रेल्वे प्रशासनावर नामुष्की ओढावत असते. आता अशीच एक घटना घडली आहे ज्यामुळे रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. कोलकात्यावरून (Kolkata) अमृतसरकडे (Amritsar) जाणारी ट्रेन सुदैवाने दुर्घटनाग्रस्त होण्यापासून बचावली आहे.


धक्कादायक बाब अशी की, ही ट्रेन जालंधर स्टेशनपासून सुमारे ३० मिनिटांपर्यंत उलट्या दिशेने धावत राहिली. नकोरडा जंक्शन येथे ३० मिनिटांनंतर पोहोचल्यावर ट्रेन चुकीच्या दिशेला जात असल्याचं ड्रायव्हरला लक्षात आलं. त्यानंतर इंजिन बदलून ट्रेन परत आपल्या मार्गावर आणण्यात आली. या दरम्यान, ट्रेनमधून प्रवास करत असलेले प्रवाशी प्रचंड घाबरून गेले. तसेच सोशल मीडियावरून अनेकांनी या घटनेबाबत सावालही उपस्थित केले. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.


दरम्यान, भारतीय रेल्वे मार्गावरील अपघातांची मालिका कायमच आहे. त्यानंतर वृंदावन रेल्वे स्टेशनपासून सुमारे ८०० मीटर पुढे एका मालगाडीचे २५ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. तर बिहारच्या मुझफ्फरपूरमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. तिथे मालगाडीचे काही डबे रुळांवरून उतरले होते. या अपघातात कुठलीही हानी झाल्याचं वृत्त नाही.




Comments
Add Comment

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती