IND vs BAN: चेन्नईत पाऊस बिघडवणार खेळ? आजपासून भारत-बांग्लादेश कसोटीला सुरूवात

मुंबई: भारतीय संघ आपल्याच घरात बांगलादेशविरुद्ध २ सामन्यांच्या कसोटी मालिका आजपासून खेळत आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरूवाच होत आहे.


मात्र या कसोटीआधी भारतीय चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर येत आहे. ही हवामानाबाबतची आहे. खरंतर, कसोटी सामन्यांत वरूणराजा चांगलाच बरसू शकतो. जर असे झाले तर सामन्याचा निकाल लागणे कठीण आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात सवाल असेल की कसोटी सामन्यांच्या दरम्यान पाचही दिवस पाऊस कोसळणार का?


Accuweather.com नुसार चेन्नईत गुरूवारी पावसाची शक्यता ४६ टक्के असेल. या दिवशी उच्च तापमान ३५ डिग्री सेल्सियस असेल. तर कमीत कमी तापमान २७ डिग्री असेल.



चेन्नई कसोटीतील पहिल्या २ दिवसांत पावसाची शक्यता


Accuweather.com नुसार सामन्याच्या पहिल्या दिवशी १९ सप्टेंबरला अधिक पावसाची शक्यता आहे. या दिवशी ४६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० सप्टेंबरला पावसाची शक्यता ४१ टक्के आहे. दिलासादायक बाब म्हणजे पुढील ३ दिवस पावसाची शक्यता अतिशय कमी आहे. शेवटचे तीन दिवस पावसाची शक्यता अनुक्रमे २५ टक्के, २४ टक्के आणि २५ टक्के राहील.



भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, आकाश दीप/मोहम्मद सिराज.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात