IND vs BAN: चेन्नईत पाऊस बिघडवणार खेळ? आजपासून भारत-बांग्लादेश कसोटीला सुरूवात

मुंबई: भारतीय संघ आपल्याच घरात बांगलादेशविरुद्ध २ सामन्यांच्या कसोटी मालिका आजपासून खेळत आहे. पहिला सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरूवाच होत आहे.


मात्र या कसोटीआधी भारतीय चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर येत आहे. ही हवामानाबाबतची आहे. खरंतर, कसोटी सामन्यांत वरूणराजा चांगलाच बरसू शकतो. जर असे झाले तर सामन्याचा निकाल लागणे कठीण आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात सवाल असेल की कसोटी सामन्यांच्या दरम्यान पाचही दिवस पाऊस कोसळणार का?


Accuweather.com नुसार चेन्नईत गुरूवारी पावसाची शक्यता ४६ टक्के असेल. या दिवशी उच्च तापमान ३५ डिग्री सेल्सियस असेल. तर कमीत कमी तापमान २७ डिग्री असेल.



चेन्नई कसोटीतील पहिल्या २ दिवसांत पावसाची शक्यता


Accuweather.com नुसार सामन्याच्या पहिल्या दिवशी १९ सप्टेंबरला अधिक पावसाची शक्यता आहे. या दिवशी ४६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० सप्टेंबरला पावसाची शक्यता ४१ टक्के आहे. दिलासादायक बाब म्हणजे पुढील ३ दिवस पावसाची शक्यता अतिशय कमी आहे. शेवटचे तीन दिवस पावसाची शक्यता अनुक्रमे २५ टक्के, २४ टक्के आणि २५ टक्के राहील.



भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जड़ेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, आकाश दीप/मोहम्मद सिराज.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत