IND vs BAN: अश्विनचे शतक, जडेजाची दमदार खेळी, पहिल्या दिवसअखेर भारत तीनशेपार

मुंबई: भारताने चेन्नई कसोटीत बांगलादेशविरुद्ध पहिल्या दिवसी गुरूवारी जोरदार कमबॅक केले. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ बाग ३३९ धावा केल्या. भारतासाठी रविचंद्रन अश्विनने दमदार कामगिरी केली. अश्विन शतक ठोकत नाबाद राहिला. तर रवींद्र जडेजाही शतकाच्या जवळ आहे. तो ८६ धावांवर नाबाद आहे. या दोघांमध्ये १९५ धावांची भागीदारी झाली. बांगलादेशसाठी हसन महमूदने ४ विकेट मिळवल्या.


टीम इंडियाने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग केली. या दरम्यान ९६ धावांवर भारताने ४ विकेट गमावल्या होत्या. तर १४४ धावांवर सहा बाद झाले होते. मात्र यानंतर जडेजा आणि अश्विनने मोर्चा सांभाळला. या दोघांदरम्यान १९५ धावांची भागीदारी झाली. अश्विन आणि जडेजा पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिले. यशस्वी जायसवालने अर्धशतक ठोकले.



अश्विनचे करिअरमधील सहावे शतक


अश्विन आठव्या स्थानावर बॅटिंगसाठी आला. त्याने या दरम्यान पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ११२ बॉलमध्ये नाबाद १०२ धावा ठोकल्या. अश्विनने या खेळीदरम्यान १० चौकार आणि २ षटकार ठोकले. अश्विनने जडेजासोबत मजबूत भागीदारी केली. जडेजाने ११७ चेंडूंचा सामना करताना नाबाद ८६ धावा केल्या. त्याने १० चौकार आणि २ षटकार ठोकले. यशस्वी जायसवालने चांगली कामगिरी केली. त्याने ११८ चेंडूत ५६ धावा केल्या.



रोहित,कोहली आणि गिल फ्लॉप


टीम इंडियाने १४ धावांवर आपली पहिली विकेट गमावली होती. रोहितने १९ चेंडूत ६ धावा केल्या. शुभमन गिल खातेही खोलू शकला नाही. त्याने ८ चेंडू खेळले. विराट कोहली ६ चेंडूंमध्ये ६ धावा करून बाद झाले. दरम्यान ऋषभ पंतने काही धावा केल्या. त्याने ५२ चेंडूत ३९ धावा केल्या. केएल राहुल १६ धावा करून बाद झाला.



बांगलादेशच्या हसनची चांगली सुरूवात


टीम इंडियाच्या सुरूवातीचे चार विकेट हसन महमूदने घेतले. त्याने पहिल्या १८ षटकांत ५८ धावा देत ४ विकेट मिळवले. या दरम्यान ४ मेडन ओव्हरनही काढले.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए