मीरा भाईंदरमध्ये उबाठाला खिंडार! उप जिल्हाप्रमुखासह शेकडो पदाधिकारी भाजपात

भाईंदर : शिवसेना उबाठा गटाचे उप जिल्हाप्रमुख, माण तालुका संपर्क प्रमुख तसेच मीरा भाईंदर मधील दमदार नेतृत्व अशी ओळख असलेले शंकर वीरकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपात प्रवेश केला आहे.


अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरात एकीकडे ढोल ताशे वाजवत गणेश विसर्जन होत असतानाच दुसरीकडे शिवसेनेचा ढाण्या वाघ समजला जाणाऱ्या शिवसेना उबाठा गटाचे उप जिल्हाप्रमुख, माण तालुका संपर्क प्रमुख शंकर वीरकर आणि युवती सेना विधानसभा अधिकारी आकांक्षा वीरकर यांनी आपल्या १८५ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांसह माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते तसेच माजी उप महापौर हसमुख गहलोत, माजी सभागृह नेते प्रशांत दळवी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यात महिला आघाडी आणि युवती सेना सुध्दा मोठ्या संख्येने होती.


शंकर वीरकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे मीरा भाईंदरमध्ये उबाठाला प्रचंड खिंडार पडले आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाची बातमी शहरात वाऱ्या सारखी पसरली आणि गणेश विसर्जन असूनही त्यांच्या निवासस्थानी मोठी रीघ लागली. वीरकर गेली २९ वर्षे शिवसेनेत कार्यरत होते. कुस्ती संघटनासह अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थेशी संबंधित असुन मीरा भाईंदर मधील शिवसेना वाढीस त्यांचा मोठा सहभाग होता.

Comments
Add Comment

Sheetal Mhatre : सिद्धिविनायक मंदिराच्या पुनर्विकासात देऊबाई पाटील यांच्या स्मृती जपण्याची मागणी

शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याकडे पत्राद्वारे

Ashish Shelar : आपत्कालीन परिस्थितीचा इंटिग्रेटेड प्लँन करा

मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांची रेल्वे, महापालिका, बेस्टला सूचना मुंबई, पावसाळ्यात पूर परिस्थितीचे

Stand-up comedian Pranit More controversy : प्रणित मोरेच्या सर्व व्हिडिओंची सखोल तपासणी होणार

 गृह राज्यमंत्री पंकज भोयर; गृह विभागाकडून सायबर पोलिसांना आदेश जारी मुंबई : अश्लील आणि विकृत विनोदांमुळे

Bhandup News : भांडुपमध्ये फेरीवाल्यांचा वाद चिघळला; ज्येष्ठ नागरिकाला मारहाण? पोलिसांची कारवाई

भांडुप : भांडुपमधील शक्तीधाम मंदिर (Shaktidham Temple) परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) झालेल्या कथित मारहाणीनंतर

BEST Bus : बेस्टला केलेल्या आर्थिक सहायाचा हिशोब द्या

एक हजार कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव ठेवला राखून मुंबई (विशेष प्रतिनिधी) आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट

Andheri Subway: अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी मिलन सब वेच्या पाच पटीने करावे लागणार काम

तरीही प्रशासनाला शंभर टक्के नाही शाश्वती तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपये खर्च करून ५० टक्केच मिळणार दिलासा मुंबई