रायगड आणि नांदेडमध्ये भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

  63

मुंबई : रायगडच्या पाली-खोपोली महामार्गावर आज भीषण अपघात घडला. यात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. कानसळ गावाजवळ स्कूल बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.


पाली-खोपोली महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी घडलेला हा मोठा अपघात आहे. कालही या महामार्गावर एसटी बस आणि बोलेरो कारचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले तर बस पलटी झाली होती. त्यातून ४८ एनसीसी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.


दुसरीकडे, नांदेडच्या कंधार-जळकोट राष्ट्रीय महामार्गावर फॉर्च्यूनर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. कंधार तालुक्यातील दत्तात्रेय मांनस्पुरे आणि शेख मगदुम यांचा जागीच मृत्यू झाला. फॉर्च्यूनर कारमधील एक व्यक्ती जखमी झाला आहे.


दरम्यान, सोलापूरच्या माढा परिसरात बार्शी-माढा एसटी बसचा ब्रेक फेल झाला होता. मात्र चालक केदारे बाबुराव नरवडे यांच्या सतर्कतेमुळे बस मुरुमाच्या ढिगाऱ्यावर नेऊन थांबवली गेली. त्यामुळे अपघात टळला आणि ३० प्रवाशांचा जीव वाचला.

Comments
Add Comment

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा