Shubman Gill : शुभमन गिल बांगलादेशच्या मालिकेत खेळणार नाही!

नवी दिल्ली : भारत आणि बांगालादेश मालिका आता फक्त काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. पण त्यापूर्वी भारतीय संघासाठी एक मोठी बाब समोर आली आहे. शुभमन गिल (Shubman Gill) आता बांगला देशच्या मालिकेतून बाहेर होणार आहे. गिलला ही मालिका का खेळता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.


भारतीय संघाला बराच दिवसांचा ब्रेक मिळाला होता. त्यानंतर आता भारतीय संघ बांगलादेशबरोबर दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. चेन्नईत भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी सराव करत आहे. भारताचा पहिला कसोटी सामना हा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दुसरा कसोटी सामना कानपूर येथे खेळणार आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन टी २० सामन्यांची मालिका होणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून गिल हा प्रकाशझोतात आला आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये तो खेळला. त्यानंतर त्याची भारतीय संघात निवड केली गेली. भारताचा फक्त पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर झाला आहे. गिल या सामन्यात खेळणार आहे. त्यानंतर गिल दुसऱ्याही सामन्यात खेळताना दिसेल.



बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की...


भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. हा सामना ७, १० आणि १३ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर लगेच १९ ऑक्टोबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना सुरू होणार आहे. त्यामुळे जर गिल टी-२० मालिकेत खेळला तर त्याला या कसोटीत खेळता येणार नाही. त्यामुळे गिलला टी-२० मालिकेमधून बाहेर ठेवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे