Shubman Gill : शुभमन गिल बांगलादेशच्या मालिकेत खेळणार नाही!

नवी दिल्ली : भारत आणि बांगालादेश मालिका आता फक्त काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. पण त्यापूर्वी भारतीय संघासाठी एक मोठी बाब समोर आली आहे. शुभमन गिल (Shubman Gill) आता बांगला देशच्या मालिकेतून बाहेर होणार आहे. गिलला ही मालिका का खेळता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.


भारतीय संघाला बराच दिवसांचा ब्रेक मिळाला होता. त्यानंतर आता भारतीय संघ बांगलादेशबरोबर दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. चेन्नईत भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी सराव करत आहे. भारताचा पहिला कसोटी सामना हा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दुसरा कसोटी सामना कानपूर येथे खेळणार आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन टी २० सामन्यांची मालिका होणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून गिल हा प्रकाशझोतात आला आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये तो खेळला. त्यानंतर त्याची भारतीय संघात निवड केली गेली. भारताचा फक्त पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर झाला आहे. गिल या सामन्यात खेळणार आहे. त्यानंतर गिल दुसऱ्याही सामन्यात खेळताना दिसेल.



बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की...


भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. हा सामना ७, १० आणि १३ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर लगेच १९ ऑक्टोबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना सुरू होणार आहे. त्यामुळे जर गिल टी-२० मालिकेत खेळला तर त्याला या कसोटीत खेळता येणार नाही. त्यामुळे गिलला टी-२० मालिकेमधून बाहेर ठेवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च