Shubman Gill : शुभमन गिल बांगलादेशच्या मालिकेत खेळणार नाही!

  61

नवी दिल्ली : भारत आणि बांगालादेश मालिका आता फक्त काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. पण त्यापूर्वी भारतीय संघासाठी एक मोठी बाब समोर आली आहे. शुभमन गिल (Shubman Gill) आता बांगला देशच्या मालिकेतून बाहेर होणार आहे. गिलला ही मालिका का खेळता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.


भारतीय संघाला बराच दिवसांचा ब्रेक मिळाला होता. त्यानंतर आता भारतीय संघ बांगलादेशबरोबर दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. चेन्नईत भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी सराव करत आहे. भारताचा पहिला कसोटी सामना हा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दुसरा कसोटी सामना कानपूर येथे खेळणार आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन टी २० सामन्यांची मालिका होणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून गिल हा प्रकाशझोतात आला आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये तो खेळला. त्यानंतर त्याची भारतीय संघात निवड केली गेली. भारताचा फक्त पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर झाला आहे. गिल या सामन्यात खेळणार आहे. त्यानंतर गिल दुसऱ्याही सामन्यात खेळताना दिसेल.



बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की...


भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. हा सामना ७, १० आणि १३ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर लगेच १९ ऑक्टोबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना सुरू होणार आहे. त्यामुळे जर गिल टी-२० मालिकेत खेळला तर त्याला या कसोटीत खेळता येणार नाही. त्यामुळे गिलला टी-२० मालिकेमधून बाहेर ठेवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.