Shubman Gill : शुभमन गिल बांगलादेशच्या मालिकेत खेळणार नाही!

नवी दिल्ली : भारत आणि बांगालादेश मालिका आता फक्त काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. पण त्यापूर्वी भारतीय संघासाठी एक मोठी बाब समोर आली आहे. शुभमन गिल (Shubman Gill) आता बांगला देशच्या मालिकेतून बाहेर होणार आहे. गिलला ही मालिका का खेळता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.


भारतीय संघाला बराच दिवसांचा ब्रेक मिळाला होता. त्यानंतर आता भारतीय संघ बांगलादेशबरोबर दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. चेन्नईत भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी सराव करत आहे. भारताचा पहिला कसोटी सामना हा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दुसरा कसोटी सामना कानपूर येथे खेळणार आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन टी २० सामन्यांची मालिका होणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून गिल हा प्रकाशझोतात आला आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये तो खेळला. त्यानंतर त्याची भारतीय संघात निवड केली गेली. भारताचा फक्त पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर झाला आहे. गिल या सामन्यात खेळणार आहे. त्यानंतर गिल दुसऱ्याही सामन्यात खेळताना दिसेल.



बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की...


भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. हा सामना ७, १० आणि १३ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर लगेच १९ ऑक्टोबरला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना सुरू होणार आहे. त्यामुळे जर गिल टी-२० मालिकेत खेळला तर त्याला या कसोटीत खेळता येणार नाही. त्यामुळे गिलला टी-२० मालिकेमधून बाहेर ठेवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

प्रभू श्रीरामांच्या नगरीत इतिहासाची पुनरावृत्ती! अयोध्या दीपोत्सवात दोन नवीन 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'

अयोध्या, उत्तर प्रदेश : प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या पुन्हा एकदा आपल्या 'भव्य आणि दिव्य दीपोत्सवा'मुळे जागतिक

केरळच्या ६ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः हवामान विभागाने

"माझी वरपर्यंत ओळख आहे" : अवैध दारूसाठा प्रकरणी व्यापारी अटकेत !

सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये एका बर्थडे पार्टीत पोलिसांनी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या वाहनातून दारूच्या साठ्यासह

बिहारमधून निवडणूक लढवणार ७२ वर्षांचे आजोबा

पाटणा : बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. यंदा बडा खोदाबंदपूर गावात राहणारे राम स्वार्थ प्रसाद हे ७२

पुराचा फटका बसलेल्यांना दिलासा मिळणार, केंद्राकडून आली मोठी मदत

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी २०२५-२६ या वर्षासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र

पुन्हा एकदा मोदी आणि अमित शाहंचा झंझावात दिसणार

पाटणा : विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह