Nitesh Rane : रक्तात गद्दारी असणाऱ्याने नितीन गडकरी आणि आनंद दिघे यांचं नाव स्वत:च्या थोबड्यातून घेऊ नये!

  118

दलाली करणाऱ्याला निष्ठवान कार्यकर्ता कधीच कळणार नाही!


आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतला फटकारले


मुंबई : आज सकाळी संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या संदर्भात मुक्तफळ उधळली आहेत. पण ज्याच्या रक्तातच गद्दारी आहे, दलाली आहे त्या माणसाला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, आनंद दिघे आणि भाजपा पक्षाचे निष्ठवान कार्यकर्ता हा कधीच कळणार नाही. त्यामुळे त्याने त्याच्या थोबड्यातून त्यांचे नाव घेऊ नये, असे म्हणत आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राजाराम राऊतला फटकारले.


नितीन गडकरी यांचे देशात आणि महाराष्ट्रात वेगळं स्थान आहेच. तसेच भाजपा पक्षामध्ये देखील एक मानाचं स्थान आहे. पक्षाची निष्ठा काय असते हे नितीन गडकरी यांनी वारंवार दाखवून दिलेले आहे. भाजपा पक्षाचा प्रधानमंत्री असणं हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून 'राष्ट्रप्रथम' हे भाजपा पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे ब्रीदवाक्य आहे. नितीन गडकरी हे एक निष्ठावान कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांची आणि संजय राजाराम राऊत सारख्या सापाची तुलना देखील करु शकत नाही, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली.



संजय राऊतच्या रक्तात गद्दारी


संजय राजाराम राऊतने २०१९ साली स्वत: मुख्यमंत्री बनण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. 'मी उद्धव ठाकरेपेक्षा वरचढ आहे, मलाच मुख्यमंत्री बनवा' यासाठी शिवसेनेच्या असंख्य आमदारांना सामना कार्यालयातून फोन करुन बोलावून घेतले. पण आमदारांकडून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या मागे नाक रगडत फिरायला लागला. त्यावेळीच याच्या रक्तात किती गद्दारी भरली हे दिसून आले.


संजय राजाराम राऊतमध्ये असलेली गद्दारी नितीन गडकरी यांच्या विचारातही नाही. त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं, भाजपा पक्ष आणि एनडीएचं पंतप्रधान होणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासाठी ते कुठलंही पद्धतीची तडजोड करणार नाहीत. म्हणून तू नितीन गडकरी यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याचं नाव मुखातूनही घेऊ नकोस, असे नितेश राणे यांनी ठणकावून सांगितले.



संजय राऊतचे विचार धर्मवीर-१ चित्रपटात दाखविले


ज्या ठाण्याने शिवसेनेला सत्ता मिळवून दिली, आनंद दिघे यांनी जिथे न्याय मिळवून दिला तिथे लेडिज बारसारखे पैसे उधळले गेले, अशी टीका संजय राऊतने केली होती. त्या टीकेला चोख प्रत्युत्तर देत नितेश राणे यांनी म्हटले की, याबाबत शिवसेना आणि शिंदे गटातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. पण आरोप करणारा संजय राजाराम राऊतला मुंबईचा जुना पवित्र महापौर बंगल्यावर तुझ्या मालकाच्या काऱट्या मुलाने जे नाईट क्लब करुन ठेवलं होत. बॉलिवूडमधले महिला कलाकारांना बोलावून पार्टी करायचा, पैसे उधळायचा, नाचगाणी करायचा ते तुला चालायचं का? असा प्रश्न उपस्थित केला.


त्यामुळे आनंद आश्रमामध्ये अशा कोणत्याही गोष्टी होऊ नये या मताचे आम्ही सर्वजण आहोत. आनंद दिघे यांवर प्रेम करणारे राज्यभरातील असंख्य लोक आहेत. पण संजय राजाराम राऊतचे याबाबत काय विचार होते ते धर्मवीर १ चित्रपटात दाखविले गेले आहेत. म्हणून संजत राजाराम राऊतने आनंद दिघे यांचे नाव स्वत:च्या थोबड्यातून घेऊ नये, असेही नितेश राणे यांनी म्हटले.

Comments
Add Comment

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

Senior Citizen Suicide: ८६ वर्षीय आजोबांची आत्महत्या! सुसाइड नोटमध्ये लिहिले...

नेरळ मधील तलावात ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करत संपवले जीवन नेरळ: आयुष्याला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने नेरळ