नवी मुंबई : केंद्र सरकारच्या (Central Government) ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने प्राप्त निर्देशानुसार १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत असून या अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यामधील ‘एक पेड माँ के नाम’ हा एक अभिनव उपक्रम सेक्टर ३६, नेरूळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानाजवळील उद्यानात संपन्न झाला.
याप्रसंगी विधानसभा सदस्य आ. गणेश नाईक, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि इतर उपस्थितांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शहरात पशूपक्ष्यांचा अधिवास वाढेल अशा ३०० हून अधिक देशी वृक्षरोपांची यावेळी लागवड करण्यात आली. ज्यामध्ये जांभूळ, वड, पिंपळ, आंबा, फणस, मोहोगणी, आवळा, पेरू, चिक्कू, सीताफळ, करंज, अर्जुन, बकुळ, सीता, अशोक, काजू, आंबा, वड, पिंपळ, करंज आदी वृक्षारोपण करण्यात आले.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…