Ghatkopar Fire : घाटकोपरमध्ये भीषण आग! परिसरात धुराचे लोट; १३ जण जखमी

मुंबई : मुंबईच्या घाटकोपर येथील रमाबाई कॉलनीतील शांती सागर इमारतीत मध्यरात्री १.३० वाजता भीषण आग लागली. यात १३ जण जखमी झाले. ही आग इमारतीच्या विद्युत मीटर केबिनमध्ये लागली होती, त्यामुळे संपूर्ण इमारतीत प्रचंड धूर पसरला. या घटनेने गोंधळ उडाला आणि काही रहिवासी वेगवेगळ्या मजल्यांवर अडकले.


आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अंदाजे दीड तासात आग आटोक्यात आणली. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ८० ते ९० जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.


जखमी झालेल्यांमध्ये ८ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. त्यांना प्रामुख्याने धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाला. त्यांना त्वरित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये हर्ष भिसे, स्वीटी कदम, जान्हवी रायगावकर, प्रियंका काळे यांचा समावेश आहे. १२ जणांवर अद्याप उपचार सुरू असून, एका व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आगेमुळे विद्युत यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असले, तरी अग्निशमन दलाच्या त्वरित प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयातील अग्निशमन प्रणाली झाली जुनी; धुर शोध प्रणालीही नाही अस्तित्वात

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरी पूर्व येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर

विक्रोळीतील निवडणूक गोदामातील सीसी टिव्ही कॅमेरे बंद

आता नव्याने सी सी टिव्ही कॅमेरांसह फायर अलार्म प्रणाली बसवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): निवडणूक खात्याच्या

मुंबईतील नागरिकांच्या सुविधेसाठी आता हेल्थ चॅटबॉट; भविष्यात रुग्णशय्या उपलब्धतता डॅशबोर्डही करणार सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने डिजिटल सेवांच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. नागरिकांच्या

मध्य प्रदेश, छत्तीसगडसाठी रेल्वेगाड्या कोकण रेल्वेवरून धावणार

नाताळ, नवीन वर्षासाठी विशेष भाडे आकारणार मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी

मध्य रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकावर प्रवाशांचा नवा तोडगा

लोकल उशिरा, तर ईमेलचा मारा मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल सेवा दररोज उशिराने धावत असल्याने, प्रवाशांचे नियोजन

विधानसभेत पुन्हा एकदा घुमला आमदार निलेश राणे यांचा आवाज

कोकणातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर वेधले सरकारचे लक्ष मुंबई : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या