Ghatkopar Fire : घाटकोपरमध्ये भीषण आग! परिसरात धुराचे लोट; १३ जण जखमी

  127

मुंबई : मुंबईच्या घाटकोपर येथील रमाबाई कॉलनीतील शांती सागर इमारतीत मध्यरात्री १.३० वाजता भीषण आग लागली. यात १३ जण जखमी झाले. ही आग इमारतीच्या विद्युत मीटर केबिनमध्ये लागली होती, त्यामुळे संपूर्ण इमारतीत प्रचंड धूर पसरला. या घटनेने गोंधळ उडाला आणि काही रहिवासी वेगवेगळ्या मजल्यांवर अडकले.


आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अंदाजे दीड तासात आग आटोक्यात आणली. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ८० ते ९० जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.


जखमी झालेल्यांमध्ये ८ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. त्यांना प्रामुख्याने धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाला. त्यांना त्वरित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये हर्ष भिसे, स्वीटी कदम, जान्हवी रायगावकर, प्रियंका काळे यांचा समावेश आहे. १२ जणांवर अद्याप उपचार सुरू असून, एका व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आगेमुळे विद्युत यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असले, तरी अग्निशमन दलाच्या त्वरित प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर