Ghatkopar Fire : घाटकोपरमध्ये भीषण आग! परिसरात धुराचे लोट; १३ जण जखमी

मुंबई : मुंबईच्या घाटकोपर येथील रमाबाई कॉलनीतील शांती सागर इमारतीत मध्यरात्री १.३० वाजता भीषण आग लागली. यात १३ जण जखमी झाले. ही आग इमारतीच्या विद्युत मीटर केबिनमध्ये लागली होती, त्यामुळे संपूर्ण इमारतीत प्रचंड धूर पसरला. या घटनेने गोंधळ उडाला आणि काही रहिवासी वेगवेगळ्या मजल्यांवर अडकले.


आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अंदाजे दीड तासात आग आटोक्यात आणली. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ८० ते ९० जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.


जखमी झालेल्यांमध्ये ८ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. त्यांना प्रामुख्याने धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाला. त्यांना त्वरित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये हर्ष भिसे, स्वीटी कदम, जान्हवी रायगावकर, प्रियंका काळे यांचा समावेश आहे. १२ जणांवर अद्याप उपचार सुरू असून, एका व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आगेमुळे विद्युत यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असले, तरी अग्निशमन दलाच्या त्वरित प्रतिसादामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.

Comments
Add Comment

मुंबईत आता जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात होणार नाही पाणीकपात, महापालिकेने असे घेतले हाती काम...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या काळामध्ये

भारत सागरी सप्ताह २०२५ मध्ये ५५,९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार

भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकारातून समृद्धी आणणार: मंत्री अमित शाह

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण मुंबई : सहकाराच्या माध्यमातून

भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कार्यालय हे मंदिरासमान

भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन मुंबई : भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी

केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या छोट्या बच्चूंसाठी गायिका डॉ अनुराधा पौडवाल यांनी दिला असा मदतीचा हात...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयासाठी आता विख्यात गायिका

एसबीआयकडून मोठ्या प्रमाणावर भरती: ३,५०० अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि