Pune News : पुणे विद्यापीठात पीएचडी प्रवेशासाठी २,७६१ विद्यार्थी पात्र

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभाग व विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रामधील पीएचडी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या पीएचडी प्रवेश परीक्षेचा (पेट) निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेसाठी २ हजार ७६१ विद्यार्थी पात्र, तर ६ हजार ३४६ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत.


विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने पीएचडी प्रवेश पूर्वपरीक्षा घेण्यात आली. त्यासाठी १० हजार ७५२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील १ हजार ६४५ विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित राहिले. विद्यापीठातर्फे लवकरच प्रवेशासंदर्भातील प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे. विद्यापीठातील विभाग व संलग्न संशोधन केंद्रामधील सुमारे १२०० जागांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, स्वायत्त महाविद्यालयांमधील रिक्त जागांची संख्या अद्याप यात समाविष्ट केलेली नाही. त्यामुळे पीएचडी प्रवेशासाठी उपलब्ध जागांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमध्ये जाऊन स्वतःचा निकाल डाऊनलोड करून घ्यावा, असे परिपत्रक विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी