Mumbai Coastal Road : मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! मरीन ड्राईव्हहून वांद्रे पोहोचणार अवघ्या १२ मिनिटांत

आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन


मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुंबईत सुरू असलेले अनेक प्रकल्प पूर्णत्वास येत असून मुंबईकरांचा प्रवासही वेगवान झाला आहे. अशातच पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुसाट होण्यासाठी प्रशासनाने कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे (Mumbai Coastal Road) काम हाती घेतले होते. हे काम पूर्ण झाले असून आज या मार्गाचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास अवघ्या काही मिनिटांत पार करु शकणार आहे. तसेच वाहतूक कोंडीतून देखील सुटका होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा १०.५८ किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत ६.२५किमीचा मार्गही सुरू झाला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा ४.५ किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास १२ मिनिटांत होणार असल्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे.


दरम्यान, वांद्रे-वरळी सी लिंक कोस्टल रोडचे आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दिपक केसरकर, तसेच मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता