Photo gallery : भक्तिमय वातावरणात गौरी विसर्जनाचा सोहळा संपन्न

मुंबई: 'सोनियाच्या पावलांनी गवर आली माहेराला' असे म्हणत माहेरपणासाठी आलेल्या गौराईंना आज भक्तिभावाने निरोप देण्यात आला. गणेश चतुर्थीच्या सहाव्या दिवशी घरी आलेल्या गौराईंचे विसर्जन अतिशय भक्तिभावाने करण्यात आले. काही ठिकाणी तर गौरींसह गणपतींचे विसर्जनही पार पडले. गणपतीच्या चौथ्या दिवशी गौरी आवाहन होते. तर सहाव्या दिवशी गौरींचे विसर्जन करण्यात आले.


गौरी विसर्जनाचा सोहळ्याची परंपरा विविध गावांमध्ये वेगवेगळी असते. कुडाळ तालुक्यातील पाट गावातही गणेश चतुर्थीच्या सहाव्या दिवशी १२ सप्टेंबरला गौरी विसर्जन अतिशय धामधुमीत पार पडले.



या दिवशी गौरीसाठी केल्या जाणाऱ्या भाजी-भाकरीचा नेवैद्य वाटण्याचा मोठा सोहळाच असतो. या दिवशी मिळणारी भाजी-भाकरीची चव तुम्हाला इतर कोणत्याच दिवशी येणार नाही.



तांदूळ, नाचणी अशा कोणत्याही धान्यांची भाकरी आणि शेवग्याचा पाल्यासह पाच प्रकारचा पाला घालून केलेली स्वादिष्ट भाजी यांचा नैवेद्य यावेळी देवीला अर्पण केला जातो.



पाट गावात याचा मोठा सोहळाच रंगतो. स्त्रिया-पुरूष सारेच या सोहळ्यात मोठ्या आनंदाने सहभागी होतात. यावेळी पुजेसाठी गौराईची मूर्ती असतेच मात्र हळदीचे रोप ही खरी देवी असते. या देवीचे विहीरीच्या ठिकाणी विसर्जन केले जाते. भजन, आरती म्हणत देवीच्या विसर्जनाची मिरवणूक निघते. त्यानंतर प्रत्येक घरातून देवीसाठी आलेला नैवेद्य एकत्र केला जातो आणि संपूर्ण गावात वाटला जातो.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : उभ्या कंटेनरला कारची भीषण धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पोलादपूरजवळ झालेल्या या अपघातात दोन

Raigad Crime :मुंबईकर मुलीची माणगावमध्ये निर्घृण हत्या, मृतदेह जंगलात फेकला, परिसरात भीतीचं वातावरण

MANGAON : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात एका १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह जंगलात फेकून

Konkan Railway Alert : मांडवी, तेजस, मत्स्यगंधासह अनेक गाड्यांच्या वेळेत १५ जूनपासून मोठे बदल...

Mumbai-Goa Trains : कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. पावसाळ्याचा विचार

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचे नाव

 मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदतवाढ मुंबई : कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि देशाचे

जहाज बांधणी क्षेत्रात २०३० पर्यंत ४० हजार नोकऱ्या- मंत्री नितेश राणे

रत्नागिरी, रायगड आणि पालघरच्या किनाऱ्यावर उभे राहणार विशाल 'शिप बिल्डिंग' प्रकल्प मुंबई (सुहास शेलार) :

Kokan Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! पावसाळ्यापूर्वी कोकण रेल्वेची मोठी तयारी, युद्धपातळीवर कामे सुरू

नवी मुंबई : कोकणवासियांसाठी आणि कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची