Mumbai Local : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी टळणार; लोकल संदर्भात मोठा निर्णय लागू

  136

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत (Mumbai Local) सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मेगाब्लॉक, तांत्रिक बिघाड अशा कित्येक कारणांमुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचे दिसून येते. प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वे प्रशासनाकडून अनेक बदल देखील करण्यात येतात. अशातच पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवाशांच्या सोयीसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानकांवर रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास चांगलीच मदत होणार आहे.



१५ डब्यांची लोकल संख्या वाढणार


मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांचा विस्तारीकरण केले जात आहे. त्याचसोबत आता रेल्वेचे डबे देखील वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यापूर्वी रेल्वे मार्गावरून १२ डब्ब्यांच्या लोकल धावत होत्या, तर आता १५ डब्यांची लोकल पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणार आहे. तसेच रोजच्या फेऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे.


सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला १५ डब्यांच्या १९९ फेऱ्या धावत आहेत. मात्र तरीही प्रवाशांची गर्दी आणि हाल होत असल्यामुळे रेल्वे संख्येत वाढ होणार आहे. १ ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होणार आहे.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून