Mumbai Local : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी टळणार; लोकल संदर्भात मोठा निर्णय लागू

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत (Mumbai Local) सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मेगाब्लॉक, तांत्रिक बिघाड अशा कित्येक कारणांमुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचे दिसून येते. प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वे प्रशासनाकडून अनेक बदल देखील करण्यात येतात. अशातच पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवाशांच्या सोयीसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानकांवर रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास चांगलीच मदत होणार आहे.



१५ डब्यांची लोकल संख्या वाढणार


मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांचा विस्तारीकरण केले जात आहे. त्याचसोबत आता रेल्वेचे डबे देखील वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यापूर्वी रेल्वे मार्गावरून १२ डब्ब्यांच्या लोकल धावत होत्या, तर आता १५ डब्यांची लोकल पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणार आहे. तसेच रोजच्या फेऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे.


सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला १५ डब्यांच्या १९९ फेऱ्या धावत आहेत. मात्र तरीही प्रवाशांची गर्दी आणि हाल होत असल्यामुळे रेल्वे संख्येत वाढ होणार आहे. १ ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होणार आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य