Mumbai Local : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी टळणार; लोकल संदर्भात मोठा निर्णय लागू

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत (Mumbai Local) सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मेगाब्लॉक, तांत्रिक बिघाड अशा कित्येक कारणांमुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचे दिसून येते. प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वे प्रशासनाकडून अनेक बदल देखील करण्यात येतात. अशातच पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवाशांच्या सोयीसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानकांवर रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास चांगलीच मदत होणार आहे.



१५ डब्यांची लोकल संख्या वाढणार


मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांचा विस्तारीकरण केले जात आहे. त्याचसोबत आता रेल्वेचे डबे देखील वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यापूर्वी रेल्वे मार्गावरून १२ डब्ब्यांच्या लोकल धावत होत्या, तर आता १५ डब्यांची लोकल पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणार आहे. तसेच रोजच्या फेऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे.


सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला १५ डब्यांच्या १९९ फेऱ्या धावत आहेत. मात्र तरीही प्रवाशांची गर्दी आणि हाल होत असल्यामुळे रेल्वे संख्येत वाढ होणार आहे. १ ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होणार आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.