Konkan Railway : चाकरमान्यांचा परतीच्या प्रवासाला सुरुवात! कोकण रेल्वे सोडणार विशेष गाड्या

कसं असेल वेळापत्रक?


मुंबई : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) चाकरमानी बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जातात. चाकरमान्यांची मोठी संख्या पाहता कोकण रेल्वेकडून (Konkan Railway) विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. अशातच दिड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनानंतर काही चाकरमान्यांचा परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातून गणेशोत्सवासाठी गेलेल्या मुंबईकर चाकरमान्यांचा परतीचा प्रवासासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची रेल्वे गाड्यांची मागणी आणि त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता जादा रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. पनवेल ते मडगावदरम्यान अतिरिक्त दोन गणशोत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत.



वेळापत्रक


गाडी क्रमांक ०१४२८ ही विशेष रेल्वेगाडी १५ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि पनवेलला ती त्याच दिवशी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी पोहोचणार आहे. ०१४२७ ही गाडी १५ सप्टेंबरला पनवेलहून रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून, मडगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा