Konkan Railway : चाकरमान्यांचा परतीच्या प्रवासाला सुरुवात! कोकण रेल्वे सोडणार विशेष गाड्या

कसं असेल वेळापत्रक?


मुंबई : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) चाकरमानी बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जातात. चाकरमान्यांची मोठी संख्या पाहता कोकण रेल्वेकडून (Konkan Railway) विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. अशातच दिड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनानंतर काही चाकरमान्यांचा परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातून गणेशोत्सवासाठी गेलेल्या मुंबईकर चाकरमान्यांचा परतीचा प्रवासासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची रेल्वे गाड्यांची मागणी आणि त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता जादा रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. पनवेल ते मडगावदरम्यान अतिरिक्त दोन गणशोत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत.



वेळापत्रक


गाडी क्रमांक ०१४२८ ही विशेष रेल्वेगाडी १५ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि पनवेलला ती त्याच दिवशी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी पोहोचणार आहे. ०१४२७ ही गाडी १५ सप्टेंबरला पनवेलहून रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून, मडगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु