Konkan Railway : चाकरमान्यांचा परतीच्या प्रवासाला सुरुवात! कोकण रेल्वे सोडणार विशेष गाड्या

कसं असेल वेळापत्रक?


मुंबई : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) चाकरमानी बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जातात. चाकरमान्यांची मोठी संख्या पाहता कोकण रेल्वेकडून (Konkan Railway) विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. अशातच दिड दिवसाच्या गणरायाच्या विसर्जनानंतर काही चाकरमान्यांचा परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून आनंदाची बातमी समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातून गणेशोत्सवासाठी गेलेल्या मुंबईकर चाकरमान्यांचा परतीचा प्रवासासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची रेल्वे गाड्यांची मागणी आणि त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता जादा रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. पनवेल ते मडगावदरम्यान अतिरिक्त दोन गणशोत्सव विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जाणार आहेत.



वेळापत्रक


गाडी क्रमांक ०१४२८ ही विशेष रेल्वेगाडी १५ सप्टेंबर रोजी मडगाव येथून सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि पनवेलला ती त्याच दिवशी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी पोहोचणार आहे. ०१४२७ ही गाडी १५ सप्टेंबरला पनवेलहून रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून, मडगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचणार आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात