पंचगंगा उत्सव मंडळाचा 'वस्त्र एक विचार… एक व्रत… एक संस्कृती' संकल्प

मुंबई: वस्त्र हा एक विचार आहे. एक व्रत आहे. ती एक संस्कृती आहे. कितीही कपडे खरेदी केले तरी मन कधीच भरत नाही हे वास्तव आहे. लाखो लोकांच्या कपड्यांच्या सततच्या मागणीमुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते आणि आपल्या निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.



निसर्गाची काळजी घेणेच नाही तर आपले आर्थिक धेय लक्षात घेऊन कपड्यांचा पुनर्वापर करणे ही केवळ आपली गरजच नाही तर आपले कर्तव्यही आहे.



आपण अनेकदा विचार न करता जुने कपडे फेकून देतो. परंतू असे काही सोपे मार्ग आहेत ज्याद्वारे आपण आपले जुने कपडे पुन्हा जिवंत करू शकतो. तसेच त्यांना पुन्हा नवीन आणि घालण्यायोग्य बनवू शकतो.



यंदाच्या वर्षी पंचगंगा उत्सव मंडळ 'वस्त्र एक विचार… एक व्रत… एक संस्कृती' हा विषय आपल्यासमोर मांडत आहे. जूने कपडे नवीन पद्धतीने करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे.



याचाच एक भाग म्हणून पुनर्निर्मिती झालेले कपडे वाडा-मोखाडा येथील आदिवासी पाड्यातील लहान थोर मंडळींना वस्त्र दान करण्यात आले.



मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी गोधडी काम कार्यशाळा घेण्यात आली. यात घरातील ठेवणीतल्या कपडयांपासून गोधडी बनविन्याचे धडे देत, गोधडीचे महत्व सांगण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पारंपारिक वस्त्रांबद्दल जन जागृतीपर कार्यशाळेचे आयोजन केले.



कपड्यांचा पुनर्वापर (Recycle & Upcycle) हा यंदाच्या आपल्या गणेशोत्सवाच्या सजावटीचा विषय आहे. या विषया संबधीची संपूर्ण सजावट तुम्हाला पाहता येणार आहे.
१. वाचनालयातून आपण पुस्तक घेऊन जातो व ठराविक दिवसांत परत देतो. वस्त्रांच्या बाबतीतही आपण असे करू शकतो. वस्त्रही घेऊन जाऊन ती पून्हा परत करू शकतो, या बद्दलची कल्पना साकारली आहे. वस्त्र संग्रहालय आणि पारंपारीक पोशाख त्यातून होणारी सांस्कृतिक जडणघडण यातून तुम्हाला दिसेल.



२. ⁠कपड्यांचे पत्रे तयार करण्यात आले असून त्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. त्याचप्रमाणे कपड्यांच्या विटा तयार करण्यात आल्या आहेत.



३. ⁠कपड्यांपासून पुस्तक निर्मिती झाली तर भविष्यात विद्यार्थ्यांसमोर आपण चांगले उदाहरण ठेवू. अभ्यासक्रमातील पुस्तके कपड्यांपासून तयार झाली तर त्यातून मुलांना पुनर्वापराची गोडी निर्माण होईल. हे दाखविण्यासाठी काही पुस्तकं तयार केली आहेत.



४. ⁠चांगली झोप ही फक्त गोधडीवरच येते, यावर संपूर्ण वैज्ञानिक अभ्यास करून त्याबद्दल महीलांना गोधडी कार्यशाळा घेत आपल्या या वारश्याचे महत्व सांगितले आहे.




उत्सव मंडळाची गणेश मूर्ती संपूर्ण शाडू मातीची आणि पर्यावरणस्नेही आहे तर सजावट संपूर्ण पर्यावरणपूरक आहे. प्लास्टीक प्रमाणे वस्त्रदेखील ही उद्याची मोठी समस्या होऊ शकतेgane, हे लक्षात घेता, यावर्षी त्यावर प्रबोधनपर प्रकाश टाकण्यात आला आहे.
शीतवातोष्णसन्त्राणं लज्जाया रक्षणं परम् ।
देहालङ्करणं वस्त्रमतः शान्तिं प्रयच्छ मे ॥

Comments
Add Comment

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा