Goregoan Traffic : वाहतूक कोंडीत अडकून रुग्णाने रुग्णवाहिकेतच जीव सोडायचा का?

गोरेगावमधील भाजपाच्या माजी नगरसेविकेचा प्रशासनाला संतप्त सवाल


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल प्रक्रिया केंद्राला जोडणाऱ्या मलनिस्सारण वाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. आधीच या परिसरातील दोन रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात केल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. त्यातच मलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू केल्याने स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने तसेच स्थानिकांसह बस अडकून शाळकरी मुलांचा आणि रुग्णवाहिकांचा मार्ग अडला जात असल्याने स्थानिक भाजपा नगरसेविका प्रिती सातम यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. रुग्णाने वाहतूक कोंडीत अडकून रुग्णवाहिकेतच जीव सोडायचा का असा सवाल करत जोवर आधी हाती घेतलेल्या रस्त्याची कामे पूर्ण होत नाही, तोवर हे काम करू देणार नाही, असा दम भरला. हे काम त्वरीत बंद करावे असे सांगत प्रशासनाला हाती घेतलेले काम स्थानिकांच्या मागणीनुसार बंद करायला लावले.



गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर रोडवर मलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदून एक मार्गिका करण्यात आल्याने यावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. याच परिसरात दोन रस्त्यांची कामे सुरू असल्याने आरे भास्कर हा एकमेव वाहतुकीसाठी होता. पण तिथेही खोदकाम करण्यात आल्याने स्थानिकांना वाहतूक कोंडी मुळे होणारा त्रास लक्षात घेत स्थानिक भाजपच्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी मल जल प्रक्रिया केंद्राचे अधिकारी, पी दक्षिण विभागाचे अधिकारी तसेच कंत्राट कंपनीचे अधिकारी यांना घटनास्थळी बोलावत प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे स्थानिकांना काय होतो, हे याची देही, याची डोळा दाखवून दिले. आणि स्थानिकांचा विचार न करता कसे चुकीच्या पद्धतीने काम केले दाखवून दिले.


या परिसरात आधीच दोन रस्ते खोदल्याने याच मार्गावरून वाहतूक होत असल्याने, तिथेही खोदकाम होत असल्याने नागरिकांनी चालायचं कसं असा सवाल करत सातम यांनी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. शाळेचे बस, बेस्ट बस आणि रुग्ण वाहिका तसेच इतर वाहनांना यांना १०० ते १५०मीटर मीटरचा टप्पा गाठायला अर्धा तास लागतो. त्यामुळे स्थानिकांची गैरसोय करून महापालिकेचे अधिकारी कोणतेही नियोजन न करता कंत्राटदाराने थेट खोदकाम सुरू केल्याने स्थानिकांची आणि शालेय मुलांची होणारी गैरसोय लक्षात घेता हे काम त्वरीत थांबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.


सुट्टीत हे काम केले असते तर शालेय मुलांची आणि लोकांची गैरसोय झाली नसती... या रस्त्यावरील काम पूर्ण झाल्यावर इतर दोन रस्त्यांच्या कामाला हात घालता आला असता... आज वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका अडकून पडते, त्यांना जायला मार्ग नाही. मग त्यातील रुग्णाने वेळेत उपचारासाठी न पोहोचल्याने मारायचे का? महापालिका प्रशासनाला अशी रुग्णवाहिका अडकवून ठेवत रुग्णाला मारायचे का? मुले शाळेत उशिरा पोहोचल्याने त्यांच्या परीक्षा बसवायच्या? विकास कामाला आणि या प्रकल्पाला विरोध नाही, पण वाहतुकीचे योग्य नियोजन करून स्थानिकांची गैरसोय होणार आणि वाहतूक कोंडी होणार नाही, अशा पद्धतीने प्रकल्पाचे काम केल्यास, स्थानिकांना विचारात घेऊन काम न केल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेवटी जिथे नागरिकांना त्रास होईल तिथे प्रशासनाने आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील

Legislature's security system : विधिमंडळाच्या सुरक्षा यंत्रणेत होणार मोठे बदल

सभापती राम शिंदेंनी दिले निर्देश; संसदीय आयुधांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष उपाययोजना मुंबई : विधिमंडळ

Shree Kshetra Chondi Development Plan : चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात • श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक मुंबई  : पुण्यश्लोक

Central Railway News : मध्य रेल्वे मार्गावर कोणताही व्यत्यय न आणता मेट्रो लाईन 2ब वरील महत्त्वपूर्ण स्टील स्पॅन उभारणी पूर्ण

कुर्ला ते टिळक नगर रेल्वे ट्रॅक दरम्यान 41.5 मीटर लांबीचा, 178 टन वजनाचा स्ट्रक्चर मुंबई :  मुंबई महानगर प्रदेश विकास

Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन ठाणे जिल्हा