Team india: बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ या महिन्यात बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना चेन्नईमध्ये १९ सप्टेंबरपासून तर दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे.


संघात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. ही भारतीय संघाची मार्च २०२४ नंतर पहिली रेड बॉल कसोटी मालिका आहे. गेल्या मालिकेत इंग्लंडला ४-१ असे हरवले होते. दुसरीकडे ही सीरज भारताचे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरची पहिली रेड बॉल मालिका असेल.



या ४ खेळाडूंना स्थान नाही


या मालिकेसह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन होत आहे. त्यांने टी-२० वर्ल्डकप फायनल नंतर ब्रेक घेतला होता. हा फायनल सामना २९ जूनला झाला होता. सोबतच दुसरा विकेटकीपर म्हणून ध्रुव जुरेलची निवड करण्यात आली आहे.


 


पहिल्या कसोटीसाठी श्रेयस अय्यर, देवदत्त पड्डिकल, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांना स्थान मिळालेले नाही. केएल राहुलला फलंदाज म्हणून सामील करण्यात आलेले आहे. कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आलेले आहे. तर स्पिनर म्हणून आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांची निवड करण्यात आली आहे.



६३४ दिवसानंतर पंतचे पुनरागमन


ऋषभ पंतवर साऱ्यांच्या नजरा टिकून होत्या. त्याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. पंत ६३४ दिवसांनी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन करत आहे. एका रस्ते अपघातात जखमी झाल्यानंतर तो संघाबाहेर होता. बांगलादेशविरुद्धची ही कसोटी मालिका आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या हिशेबाने महत्त्वाची असेल. या वर्षाच्या अखेरीस ही स्पर्धा असणार आहे.



पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

Comments
Add Comment

रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोज - मंत्री आशिष शेलार

मुंबई : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी

Mohammed Shami : "मी जेव्हा..."; निवृत्तीच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडले मौन

मुंबई : टीम इंडियासोबत आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा मोहम्मद शमी अचानक गायब झाला. चॅम्पियन्स

IPL 2026 : तेवतियाच्या बॅटवर पंचांचा आक्षेप! ऐन सामन्यातच बदलावी लागली बॅट

मुंबई : आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात केवळ पराभवच नाही, तर एक वादग्रस्त

IPL 2026 : पदार्पणाच्या सामन्यातच कॉनॉलीचा ‘वन-मॅन शो’; पंजाबचा गुजरातवर ३ विकेट्स राखून विजय

आयपीएल २०२६ ची दमदार सुरुवात करत पंजाब किंग्सने न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथे गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून

William Langford : मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा रहस्यमयी मृत्यू, खोलीत आढळला मृतदेह

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आयपीएल २०२६ निमित्त भारतात आलेल्या बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट