Team india: बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ या महिन्यात बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना चेन्नईमध्ये १९ सप्टेंबरपासून तर दुसरा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये होणार आहे.


संघात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. ही भारतीय संघाची मार्च २०२४ नंतर पहिली रेड बॉल कसोटी मालिका आहे. गेल्या मालिकेत इंग्लंडला ४-१ असे हरवले होते. दुसरीकडे ही सीरज भारताचे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरची पहिली रेड बॉल मालिका असेल.



या ४ खेळाडूंना स्थान नाही


या मालिकेसह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन होत आहे. त्यांने टी-२० वर्ल्डकप फायनल नंतर ब्रेक घेतला होता. हा फायनल सामना २९ जूनला झाला होता. सोबतच दुसरा विकेटकीपर म्हणून ध्रुव जुरेलची निवड करण्यात आली आहे.


 


पहिल्या कसोटीसाठी श्रेयस अय्यर, देवदत्त पड्डिकल, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांना स्थान मिळालेले नाही. केएल राहुलला फलंदाज म्हणून सामील करण्यात आलेले आहे. कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आलेले आहे. तर स्पिनर म्हणून आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांची निवड करण्यात आली आहे.



६३४ दिवसानंतर पंतचे पुनरागमन


ऋषभ पंतवर साऱ्यांच्या नजरा टिकून होत्या. त्याचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. पंत ६३४ दिवसांनी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन करत आहे. एका रस्ते अपघातात जखमी झाल्यानंतर तो संघाबाहेर होता. बांगलादेशविरुद्धची ही कसोटी मालिका आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या हिशेबाने महत्त्वाची असेल. या वर्षाच्या अखेरीस ही स्पर्धा असणार आहे.



पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात