IND vs BAN: या दिवशी होणार बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा?

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. आतापर्यंत बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. आता ही मालिका सुरू होण्यास अवघे १० दिवस शिल्लक आहेत. अशातच सर्वांनाच टीम इंडियाच्या निवडीची उत्सुकता आहे.


रिपोर्टनुसार उद्या म्हणजेच ९ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिली कसोटी मालिका असणार आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले जात आहे की गंभीर कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख सिलेक्टर अजित आगरकरसोबत मिळून संघाची निवड करतील.


भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान पहिला कसोटी सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघादरम्यान २७ सप्टेंबरला कानपूरमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल. कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघादरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. टी-२० मालिकेसाठी रविवारी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते.


बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संभाव्य १५ सदस्यीय संघ - रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत(विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन. मोहम्मद सिराज, आकाशदीप, केएल राहुल(रिझर्व्ह ओपनर), ध्रुव जुरेल, कुलदीप यादव आणि नवदीप सैनी.

Comments
Add Comment

Asia Cup 2025 : पाकिस्तान 'सुपर-४' मध्ये, आता पुन्हा भारताशी होणार 'महामुकाबला'

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने यूएईचा ४१ धावांनी पराभव करत 'सुपर-४' फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले

पाकिस्तानच्या 'खोट्या' फुटबॉल संघाचा जपानमध्ये पर्दाफाश

इस्लामाबाद: एका फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या 'बनावट' फुटबॉल संघाला जपानी

Asia Cup 2025: पाकिस्तानची नाटकं काही चालेना, UAE विरुद्ध सामन्याला ९ वाजता होणार सुरूवात

दुबई: आशिया कप २०२५मध्ये आज १०वा सामना पाकिस्तान आणि यजमान यूएई यांच्यात खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याच्या

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी

चंदीगड : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना चमकदार कामगिरी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आणि

Asia Cup 2025 : सुपर 4 मध्ये पोहोचताच टीम इंडियाला मिळाली आनंदाची आणखी एक बातमी

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळत असलेला भारतीय संघ एशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीत पोहोचला आहे. आता भारत

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स