IND vs BAN: या दिवशी होणार बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा?

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. आतापर्यंत बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केलेली नाही. आता ही मालिका सुरू होण्यास अवघे १० दिवस शिल्लक आहेत. अशातच सर्वांनाच टीम इंडियाच्या निवडीची उत्सुकता आहे.


रिपोर्टनुसार उद्या म्हणजेच ९ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिली कसोटी मालिका असणार आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले जात आहे की गंभीर कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख सिलेक्टर अजित आगरकरसोबत मिळून संघाची निवड करतील.


भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान पहिला कसोटी सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे. यानंतर दोन्ही संघादरम्यान २७ सप्टेंबरला कानपूरमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल. कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघादरम्यान तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. टी-२० मालिकेसाठी रविवारी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते.


बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संभाव्य १५ सदस्यीय संघ - रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत(विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन. मोहम्मद सिराज, आकाशदीप, केएल राहुल(रिझर्व्ह ओपनर), ध्रुव जुरेल, कुलदीप यादव आणि नवदीप सैनी.

Comments
Add Comment

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील अमेरिकेविरुद्धच्या साखळी सामन्यात पाकिस्तानचा ३२ धावांनी विजय

T20 World Cup 2026 NZ vs UAE: यूएईला धूळ चारत न्यूझीलंडचा एकतर्फी विजय

चेन्नई: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला आहे. आज म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी

T20 World Cup 2026 NED vs NAM: नेदरलॅंड्सच्या विजयी खेळीचा पाकिस्तानला फटका

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला आहे. आज म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी

IND vs PAK सामना निश्चित; ICCच्या हस्तक्षेपानंतर पाकिस्तानने १० दिवसात टेकले गुडघे

मुंबई : भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही, या मुद्द्यावर निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. टी-20 वर्ल्ड

BCCI Central Contracty Players List: बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून 'या' पाच मोठ्या खेळाडूंची नावे गायब

दिल्ली: बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून दुर्लक्षित खेळाडू: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुढील हंगामासाठी

Palghar: आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा भीषण अपघातात मृत्यू

पालघर: भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारा नेमबाज संभाजी शिवाजी पाटील याचा वयाच्या २७ व्या