मुंबई : काही दिवसांपूर्वी (Fires and accidents) बोरिवली येथील २२ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत ४ नागरिक जखमी झाले होते. तर त्यातील एका वृद्ध नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मुंबईतील (Mumbai News) आगीची ही घटना ताजी असताना पुन्हा लोअर परेल परिसरातील कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरला भीषण आग (Mumbai Kamala Mills Fire) लागल्याची घटना घडली आहे. यामुळे मुंबईतील बांधकाम आणि घरांच्या सुरक्षेचा (Construction and housing safety) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मालाड येथील हाजी बापू मार्गावरील गोविंद नगर येथील बांधकाम सुरू असलेल्या नवजीवन या इमारतीच्या २० व्या मजल्याच्या छताचा काही भाग गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.
मालाड येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (झोपु) बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. मालाड पूर्व येथील नवजीवन इमारतीमध्ये दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घडना घडली.
विक्रोळी येथील घटनेत लिफ्टच्या डक्टमध्ये पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रत्नाकर फकिरा मुनी (३१) आणि उमा राजेंद्र सामल (२१) अशी मृतांची नावे असून मूळचे दोघे ओडिशाचे रहिवासी आहेत. या प्रकरणी लेबर कॉन्ट्रॅक्टर अरविंद हरजी रामजीआनी विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चेंबूर (पश्चिम) भागात बुधवारी सायंकाळी एकमजली घराचा स्लॅब आणि लोखंडी अँगल कोसळल्याने दीड वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सरस्वती गल्लीत घडलेल्या या दुर्घटनेत, छोटी खुशी साळवे गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दुर्घटनेत ३५ वर्षीय कविता साळवे जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
चेंबूरमधील या दुर्घटनेच्या काही तासांपूर्वीच मुंबईच्या पूर्व उपनगरातील विद्याविहार आणि विक्रोळी येथे दोन इमारत दुर्घटना घडल्या.
विद्याविहारमध्ये एक बांधकाम सुरू असलेल्या १५ मजली इमारतीची बांबूची संरचना कोसळली, ज्यात दोन कामगार नबियाद शेख (२६) आणि मोहन शेख (३८) जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विक्रोळीतील वर्षानगर भागात डोंगरावरच्या घराची भिंत कोसळून दोन व्यक्ती जखमी झाल्या. त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला आणि स्थानिक डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. या दुर्घटनेमुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून दोन घरे रिकामी करण्यात आली असून रहिवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
या दुर्घटनांमुळे मुंबईत बांधकाम आणि घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या सर्व घटनांच्या कारणांची तपासणी करत आहेत.
मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…