मुंबईत पुन्हा हिट अँड रन, अल्पवयीन चालकाची बाईकस्वाराला धडक, एकाचा मृत्यू

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पुणेतील पोर्शे प्रकरणासारखे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. येथे अल्पवयीन चालकाने एका बाईकस्वाराला चिरडले. या अपघातात या २४ वर्षीय बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर अल्पवयीन आरोपी चालकाला पकडण्यात आले. अल्पवयीन मुलाव्यतिरिक्त आणखी दोन जणांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर अल्पवयीन मुलाने तेथून पळून जाण्यचाा प्रयत्न केला होता.


हा अपघात मुंबईच्या गोरेगाव परिसरात घडला. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी धरपकड केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी वेगवान महिंद्रा स्कॉर्पिओने २४ वर्षीय बाईकस्वाराला उडवले. जखमी तरूणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणात कार ताब्यात घेतली आहे.



अपघातानंतर खांबाला आदळली एसयूव्ही


पोलिसांच्या माहितीनुसार बाईकस्वाराला धडक मारल्यानंतर ही गाडी एका विजेच्या खांबाला जाऊन आदळली. यात अल्पवयीन चालकालाही जखमा झाल्या आहेत. यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडले.


मृत २४ वर्षीय तरूणाचे नाव नवीन वैष्णव असे होते. तो गोरेगाव परिसरात दूध वाटत होता. हा अपघात सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आरे कॉलनीमध्ये घडला. आरोपी चालकाचे वय १७ वर्षे आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील