Soybeans Price Hike : सोयाबीन, हरभऱ्याच्या दरात पहिल्यांदा वाढ; हंगामपूर्व दिलासा!

  177

दरवाढीचा अधिक फायदा व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांचा आरोप


अमरावती : सणासुदीच्या दिवसात सातत्याने अनेक गोष्टींची दरवाढ (Price Hike) होत आहे. मात्र सोयाबीनला (Soybeans) वर्षभरात हमीभावदेखील मिळालेला नाही. अनेक दिवसांपासून सोयाबीनचे दर हे चार हजार रुपये क्विंटलवर स्थिरावले होते. परंतु आता महिन्याभरात हंगाम सुरू होत असताना सोयाबीनला ४ हजार ६०० रुपयांवर दर मिळाला आहे. शिवाय पाच-साडेपाच हजारांवर स्थिरावलेल्या हरभऱ्यालाही पहिल्यांदा ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.


गतवर्षीच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे सरासरी उत्पन्न कमी आल्याने सोयाबीनची मागणी वाढून दरवाढ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. यादरम्यान वर्षभरात प्रत्यक्षात सोयाबीनला हमीभाव मिळाला नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावात सोयाबीनची विक्री केली.


त्यानंतर आता दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांना फायदा न होता व्यापाऱ्यांनाच फायदा होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यंदा केंद्र शासनाने सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे सोयाबीनला सद्यस्थितीत मिळत असलेला ४ हजार ६०० रुपये क्विंटल हा दर हमीभावापेक्षा कमीच आहे.



सणासुदीच्या दिवसात हरभऱ्याची दरवाढ


दोन महिन्यांपासून सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे चणाडाळीची मागणी वाढली व पर्यायाने हरभऱ्याचीही दरवाढ झालेली आहे. नवीन हरभरा मार्केटमध्ये विक्रीला यायला चार ते पाच महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. येथील बाजार समितीमध्ये १०४ पोत्यांची आवक झाली.

Comments
Add Comment

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक