Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.


आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर चेतन तुपे म्हणाले की, "गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारे कृत्य बीडमध्ये घडले आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन नराधमांकडून एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. परंतू, एवढ्या गंभीर गुन्ह्यात पॉक्सोसारख्या कायद्यात केवळ तीन दिवसांची पीसीआर का मागितली? या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी. या दोन्ही आरोपींच्या मागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे का? त्यांच्यामागे कुणीतरी गब्बर राजकारणी उभे आहेत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.



"या प्रकरणातील पीडित मुलीने समोर येऊन तक्रार दाखल केली. परंतू, अजून किती मुलींसोबत ही घटना घडली? या आरोपींनी आणखी किती मुलींसोबत हे कृत्य केले याबद्दलची माहिती पुढे यायला हवी. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करणार का? या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमणार का? आणि त्यात एखाद्या महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियूक्ती केली जाणार का? तसेच इतरही मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत असे काही घडले का? याच्या तपासासाठी काही विशेष यंत्रणा उभी करणार का?" असा सवाल आमदार चेतन तुपे यांनी केला.




वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमणार 


यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बीडमध्ये घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. कोचिंग क्लासच्या माध्यमातून मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली असून त्यातील एका मुलीने आणि तिच्या आईने गुन्हा नोंदवल्याने याबद्दलची वस्तूस्थिती बाहेर आली. पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत तो गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील आरोपींना दोनच दिवसांची कोठडी का मागण्यात आली, यासंदर्भात नक्कीच चौकशी केली जाईल. या प्रकरणात राज्यात मोठ्या प्रमाणात रोष असून याची व्याप्ती अधिक असू शकते अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. एक मुलगी हिंमतीने समोर आली. पण आणखी अशा किती मुलींसोबत असा व्यवहार झाला, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि यातील संवेदनशीलता लक्षात घेता वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी तयार करण्यात येईल," अशी घोषणा त्यांनी केली.





मुलींना योग्य न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार


"एसआयटीच्या माध्यमातून या गुन्ह्याची चौकशी करण्यात येईल. या प्रकरणाची व्याप्ती कुठपर्यंत आहे? यामागे कुणाचा वरदहस्त आहे का? कुणी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या वेगवेगळे वळण देत आहे का? या सगळ्याची चौकशी करण्यात येईल. तसेच या माध्यमातून आमच्या मुलींना योग्य न्याय मिळावा यादृष्टीने आम्ही प्रयत्न करू. टाईम बाऊंड पद्धतीने एसआयटी याची चौकशी करेल. याप्रकरणाचा पूर्ण छडा लावून अशा नराधमांना आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण