सोलापूर : मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात एका विवाहित महिलेवर तीन मित्रांनी जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास तुझ्या दोन मुलांना जीवे मारून टाकेन अशी धमकी दिल्याने या त्रासाला कंटाळून महिलेने तलावात उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी सुरज सुभाष नकाते (वय २९), तोसिफ चाँदसाो मुजावर (वय २४), शुभम मोहन नकाते (वय २४) या तिघांना पोलिसांनी अटक केले आहे.
मृत महिलेचा पती कुटुंबासह पुणे येथे राहण्यास होते. हे कुटुंब २८ जुलै २०२४ रोजी त्यांच्या मूळ गावी आले होते. यातील आरोपी हा नातेवाईक असल्याने तो नेहमी पुणे येथे घरी फिर्यादी घरी नसताना ये जा करीत असे. तो नातेवाईक असल्याने मृत पत्नीच्या पतीला कुठलाही संशय आला नव्हता. तर तिघे आरोपी हे खास मित्र आहेत. ही महिला २१ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तिच्या आईला भेटण्यासाठी घरी जावून येते असे सांगून गेली होती.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…