Hair care: केस होतील लांब आणि घनदाट, फक्त खा या गोष्टी

मुंबई: प्रत्येकाला असे वाटते की केस लांब आणि घनदाट असावेत. ज्यांचे केस पातळ असतात ते नेहमीच विविध पर्याय वापरत असतात. यामुळे केस वाढण्यास मदत मिळते.मात्र केवळ बाहेरून काही पदार्थ लावून केस लांब आणि घनदाट होत नाहीत तर आतूनही काही गोष्टींचे सेवन करणे गरजेचे असते.

यामुळे शरीराला आवश्यक ती पोषकतत्वे मिळतात. तसेच केसांची वाढ निरोगी होते. जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल...

अंडी


केसांना पुरेसे प्रोटीन देण्यासाठी तुम्ही अंडी खाऊ शकता. प्रोटीनने भरलेल्या अंड्यांचा डाएटमध्ये समावेश करणे सोपे आहे आणि केसांसाठी चांगलेही. तुम्ही नाश्त्यामध्ये दररोज अंडी खाऊ शकता.

पालक


केसांसाठी पालक खाणे अतिशय गरजेचे आहे. कारण पालकामध्ये आर्यन मोठ्या प्रमाणात असते. शरीरात लोहाची कमतरता झाल्यास केस गळू लागतात.

सुका मेवा


केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे सेवन करणे चांगले असते. सुका मेवा जसे बदाम आणि अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात आढळते.

आंबट फळे


व्हिटामिन सी शरीरात लोह शोषून घेण्यास मदत करते. यामुळे आपल्या खाण्यापिण्यात नेहमी आंबट फळांचा समावेश जरूर करावा. सोबतच स्काल्पसाठी व्हिटामिन सी चांगले असते.

गाजर


व्हिटामिन ए भरपूर प्रमाणात असलेल्या गाजराचा डाएटमध्ये समावेश केल्यास केसांची वाढ निरोगी होते. व्हिटामिन ए स्काल्पला नॅचरल सीबम बनवण्यास मदत करतात. तसेच केसांची मुळे निरोगी राहतात.
Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण