देशातील ९५ टक्के भारतीय Spam Callsने झालेत हैराण

मुंबई: देशभरात स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. TRAI च्या प्रयत्नांनंतरही अशा प्रकरणांमध्ये वाढच होत आहे. दरम्यान, नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये याचा खुलासा झाला आहे. सर्व्हेनुसार तब्बल ९५ टक्के भारतीयांना दररोजच्या येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजेसचा त्रास होत आहे. इतकंच की गेल्या ६ महिन्यांत यात वाढ झाली आहे. सोबतच फोनमध्ये असलेले DND फीचरही असे कॉल्स रोखण्यात फायदेशीर ठरत नाही आहे.


नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. यानुसार ९५ टक्के भारतीय मोबाईल युजर्सला दररोज स्पॅम कॉल्सचा सामना करावा लागतो. स्कॅमर्सही दररोज लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत आहेत. असे कॉल्स होम लोन, क्रेडिट कार्डसह फायनान्शियल सेक्टरमधून येत आहेत. गेल्या सहा महिन्यात या केसेसमध्ये ५४ टक्क्यांवरून ६६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.



DND फीचरचा फायदा नाही


स्मार्टफोन आणि टेलिकॉम कंपन्यांकडून दिले जाणारे Do Not Disturb हे फीचरही फायद्याचे ठरत नाही आहे. स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसमुळे लोक चांगलेच त्रस्त आहेत.



TRAI उचलणार ठोस पाऊल


टेलिकॉम कंपन्यांना प्रोमेशनल मेसेजेस रोखण्याचे आदेश दिले होते. याची डेडलाईन १ सप्टेंबर होती. याची डेडलाईन वाढवून १ ऑक्टोबर २०२४ करण्यात आली आहे. ट्रायच्या मते लवकराच लवकर या कॉल्सवर रोखण्याचे आदेश आहेत.

Comments
Add Comment

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने

Rain Alert: दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

नवी दिल्ली: दिल्ली एनसीआरमध्ये शुक्रवारी सकाळी जोरदार वाऱ्यांमुळे हवामान बदलले. हवामान विभागाने संपूर्ण उत्तर

गडबड कराल तर पस्तावाल असा धडा शिकवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून