देशातील ९५ टक्के भारतीय Spam Callsने झालेत हैराण

  112

मुंबई: देशभरात स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. TRAI च्या प्रयत्नांनंतरही अशा प्रकरणांमध्ये वाढच होत आहे. दरम्यान, नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये याचा खुलासा झाला आहे. सर्व्हेनुसार तब्बल ९५ टक्के भारतीयांना दररोजच्या येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजेसचा त्रास होत आहे. इतकंच की गेल्या ६ महिन्यांत यात वाढ झाली आहे. सोबतच फोनमध्ये असलेले DND फीचरही असे कॉल्स रोखण्यात फायदेशीर ठरत नाही आहे.


नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. यानुसार ९५ टक्के भारतीय मोबाईल युजर्सला दररोज स्पॅम कॉल्सचा सामना करावा लागतो. स्कॅमर्सही दररोज लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत आहेत. असे कॉल्स होम लोन, क्रेडिट कार्डसह फायनान्शियल सेक्टरमधून येत आहेत. गेल्या सहा महिन्यात या केसेसमध्ये ५४ टक्क्यांवरून ६६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.



DND फीचरचा फायदा नाही


स्मार्टफोन आणि टेलिकॉम कंपन्यांकडून दिले जाणारे Do Not Disturb हे फीचरही फायद्याचे ठरत नाही आहे. स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसमुळे लोक चांगलेच त्रस्त आहेत.



TRAI उचलणार ठोस पाऊल


टेलिकॉम कंपन्यांना प्रोमेशनल मेसेजेस रोखण्याचे आदेश दिले होते. याची डेडलाईन १ सप्टेंबर होती. याची डेडलाईन वाढवून १ ऑक्टोबर २०२४ करण्यात आली आहे. ट्रायच्या मते लवकराच लवकर या कॉल्सवर रोखण्याचे आदेश आहेत.

Comments
Add Comment

अमेरिकेचा निर्णय दुर्दैवी आणि अन्यायकारक, ट्रम्प यांच्या आदेशानंतर भारताची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने

एकनाथ शिंदे यांनी घेतली नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट, शिवसेना-मनसेच्या युतीवरुन दिली 'ही' प्रतिक्रिया

नवी दिल्ली: नवी दिल्ली दौऱ्यावर असताना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची

PM Modi on Kartavya Bhavan: "कर्तव्य भवनमुळे १५०० कोटी रुपये भाडे वाचेल", उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी दिली माहिती

कर्तव्य भवनातून पंतप्रधान मोदींचे भाषण नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील

Breaking News! डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतावर ५०% आयात शुल्क लादण्याचे आदेश

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क लावण्याच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर पहिल्यांदाच मोदी चीनच्या दौऱ्यावर! काय होणार चर्चा?

एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान होणार सहभागी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस जपान आणि