देशातील ९५ टक्के भारतीय Spam Callsने झालेत हैराण

मुंबई: देशभरात स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. TRAI च्या प्रयत्नांनंतरही अशा प्रकरणांमध्ये वाढच होत आहे. दरम्यान, नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये याचा खुलासा झाला आहे. सर्व्हेनुसार तब्बल ९५ टक्के भारतीयांना दररोजच्या येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजेसचा त्रास होत आहे. इतकंच की गेल्या ६ महिन्यांत यात वाढ झाली आहे. सोबतच फोनमध्ये असलेले DND फीचरही असे कॉल्स रोखण्यात फायदेशीर ठरत नाही आहे.


नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. यानुसार ९५ टक्के भारतीय मोबाईल युजर्सला दररोज स्पॅम कॉल्सचा सामना करावा लागतो. स्कॅमर्सही दररोज लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत आहेत. असे कॉल्स होम लोन, क्रेडिट कार्डसह फायनान्शियल सेक्टरमधून येत आहेत. गेल्या सहा महिन्यात या केसेसमध्ये ५४ टक्क्यांवरून ६६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.



DND फीचरचा फायदा नाही


स्मार्टफोन आणि टेलिकॉम कंपन्यांकडून दिले जाणारे Do Not Disturb हे फीचरही फायद्याचे ठरत नाही आहे. स्पॅम कॉल्स आणि मेसेजेसमुळे लोक चांगलेच त्रस्त आहेत.



TRAI उचलणार ठोस पाऊल


टेलिकॉम कंपन्यांना प्रोमेशनल मेसेजेस रोखण्याचे आदेश दिले होते. याची डेडलाईन १ सप्टेंबर होती. याची डेडलाईन वाढवून १ ऑक्टोबर २०२४ करण्यात आली आहे. ट्रायच्या मते लवकराच लवकर या कॉल्सवर रोखण्याचे आदेश आहेत.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर