AP-Telangana: शाळा बंद-ट्रेन रद्द, आंध्र-तेलंगणामध्ये पुराचा कहर!

नवी दिल्ली: तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच वित्तहानीही मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. यामुळे नद्या तुफान वाहत आहेत. तसेच हैदराबादसह विजयवाडा सारख्या शहरेही जलमय झाली आहेत.


स्थिती जाणून घेण्यासाठी तसेच बचाव कार्याच्या समन्वयासाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंक्षी ए रेवंत रेड्डी आणि एन चंद्राबाबू नायडू यांनी आपात्कालीन बैठक घेतली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही दोन्ही मुख्यमंत्र्‍यांशी बातचीत केली तसेच केंद्राकडून संपूर्ण मदत मिळण्याचे आश्वासन दिले.


जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार दोन सप्टेंबरला सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी पटरीवर पाणी भरल्याने ९९ रेल्वे रद्द करण्यात आल्या.



पंतप्रधानांनी फोनवरून घेतली माहिती


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी बातचीत केली. तसेच या राज्यांतील स्थिती जाणून घेतली.त्यांनी या आव्हानाशी लढण्यासाठी केंद्राकडून हवी ती मदत मिळणार असल्याचे आश्वासन दिले.


मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की राज्य सरकार सातत्याने लोकांना याबाबतीत मदत करत आहे. खम्मम जिल्ह्यात मोठे नुकसान झाल्याची माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव