AP-Telangana: शाळा बंद-ट्रेन रद्द, आंध्र-तेलंगणामध्ये पुराचा कहर!

नवी दिल्ली: तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच वित्तहानीही मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. यामुळे नद्या तुफान वाहत आहेत. तसेच हैदराबादसह विजयवाडा सारख्या शहरेही जलमय झाली आहेत.


स्थिती जाणून घेण्यासाठी तसेच बचाव कार्याच्या समन्वयासाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंक्षी ए रेवंत रेड्डी आणि एन चंद्राबाबू नायडू यांनी आपात्कालीन बैठक घेतली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीही दोन्ही मुख्यमंत्र्‍यांशी बातचीत केली तसेच केंद्राकडून संपूर्ण मदत मिळण्याचे आश्वासन दिले.


जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार दोन सप्टेंबरला सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी पटरीवर पाणी भरल्याने ९९ रेल्वे रद्द करण्यात आल्या.



पंतप्रधानांनी फोनवरून घेतली माहिती


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी बातचीत केली. तसेच या राज्यांतील स्थिती जाणून घेतली.त्यांनी या आव्हानाशी लढण्यासाठी केंद्राकडून हवी ती मदत मिळणार असल्याचे आश्वासन दिले.


मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की राज्य सरकार सातत्याने लोकांना याबाबतीत मदत करत आहे. खम्मम जिल्ह्यात मोठे नुकसान झाल्याची माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली.

Comments
Add Comment

Plane Crash News : हवेतच विमानाचे नियंत्रण सुटले अन् दोन्ही वैमानिकांचा...प्रयागराजमध्ये भीषण अपघात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आज दुपारी भारतीय वायू सेनेच्या एका प्रशिक्षणार्थी विमानाला

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

राज्यपालांचा सभागृहातून सभात्याग नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना