Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी विविध साहित्यांनी सजली बाजारपेठ

तळा : महाराष्ट्राच्या लाडक्या बाप्पाचे आगमन यंदा लवकरच असल्याने गणेशोत्सवात लागणाऱ्या विविध साहित्यांनी तळा बाजारपेठ सजली आहे. मुंबईकर पाच दिवस आधीच कोकणात पोहोचतात. बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु होते. या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या असून आता इथे खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसून येत आहे.


गणेशोत्सवासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असल्याने रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरित झालेले मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपल्या गावी परतू लागले आहेत. चाकरमानी चार दिवस आधीच गावी येऊन गावातील घराची साफसफाई करून घरामध्ये गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य भरून ठेवतात.तळा हे तालुक्याचं ठिकाण असल्याने आजूबाजूला वसलेले खेड्यातील अनेक नागरिक खरेदीसाठी शहरात येत असतात.तसेच फळे, पालेभाज्या,व इतर जीवनावश्यक वस्तू माफक दरात मिळत असल्याने खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.


गणरायाच्या पूजेसाठी लागणारे धुप, कापुर, अगरबत्ती, गळ्यातील कंठीहार,सजावटीसाठी लागणारे कृत्रिम फुलांच्या माळा तसेच विविध साहित्यांनी तळा बाजारपेठ सजली आहे.यावर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान महिलांच्या खात्यात जमा झाल्याने बाजारात खरेदीसाठी महिला वर्गाची देखील लगबग पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा