ताई आमची भारी - कविता आणि काव्यकोडी

मला आई देते
रोज एकच लाडू
ताईला लाडू दोन
वर दुधाचा गडू


आईने आणली मला
वही फक्त एक
ताईला मात्र आणल्या
वह्या सुंदर अनेक


आई म्हणते पुरे
एकच पेरू तुला
चार पेरू मोठे मात्र
देते ती ताईला


आईने खेळायला मला
आणली मोटार भारी
ताईला आणल्या चक्क
पाच नव्या मोटारी


आई म्हणते गळ्यात
माझ्या एकही नको माळ
ताईला मात्र म्हणते
तू चार माळा घाल


आई म्हणते मला
ताई तुझ्यापेक्षा मोठी
जास्त तिला देण्यात
कसली आलीय खोटी


एक अनेक यावरून
वाद नसतोच घरी
खरं सांगू का तुम्हाला
ताई जगात भारी !



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) कंदांची, पानांची,
देठांचीसुद्धा भाजी
पानांच्या वड्या खाण्यात
सारेच आहेत राजी


पानांवर पाणी याच्या
थांबत नाही बरं
सांगा या पानांचं
नाव काय खरं?


२) पीठ, मैदा, रवा,
याचा करतात तयार
याच्यापासून पक्वान्नही
बनवतात फार


हिरव्या लोंब्या शेकून
हुरडा याचा खातात
चपातीच्या पिठासाठी
गिरणीत काय नेतात?


३) कांद्याच्या सोबतीला
नेहमीच असतो
फराळाच्या पदार्थांत
मिरवताना दिसतो


याला खाऊन माणसं
होई गोलमगोल
डोक्यात कोण भरलं की
चिडून जातो तोल?



उत्तर -


१) अळू
२) गहू
३) बटाटा

Comments
Add Comment

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

एकेकाचे स्वभाव

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर मानुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजात वावरताना आपल्याला विविध स्वभावाची

समुद्र कसे निर्माण झाले?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील शिवम व त्याचे सवंगडी सहलीला गेले असताना दुपारचे जेवण झाल्यावर विश्रांती घेत बसले