Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवात महामार्गावरील वाहतूककोंडीवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; चाकरमान्यांचा प्रवास होणार खड्डे मुक्त!

  88

रायगड पोलिसांचा दावा


रायगड : गणेशोत्सवाला अवघे काहीच दिवस शिल्लक उरले असताना अनेक चाकरमानी बाप्पाच्या आगमनासाठी गावी जातात. त्यातच यावेळी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांचा ‘वाहतूककोंडी व खड्डे मुक्त’ प्रवास होईल, असा दावा रायगड पोलिसांनी केला आहे. त्यासोबत वाहतूककोंडी टाळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार असून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी विविध सोयी देखील उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. तसेच गतवर्षी वाहतूककोंडीवर नजर ठेवण्नण्यासाठी दोन ड्रोन कॅमेरे होते. यंदा त्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.



अवजड वाहनांना बंदी


गणेशोत्सव काळात ५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते ८ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत आणि ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १३ सप्टेंबर ११ वाजेपर्यंत, तसेच १७ सप्टेंबरला रात्री ८ वाजल्यापसून ते १८ सप्टेंबर रोजी रात्री ४ वाजेपर्यंत १६ टन व त्यापेक्षा अधिक अवजड वाहनांना बंदी राहील.



गणेश भक्तांसाठी सुविधा


केंद्रे खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी, पोलादपूर येथे सुविधा केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये चहापान कक्ष, वैद्यकीय कक्ष, फोटो गॅलरी, पोलिस मदत केंद्र, बालक आहार कक्ष, वाहनतळ, वाहन दुरुस्ती कक्ष तयार केले जाणार आहेत.



फलक नसल्यास कारवाई


रायगड जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग हद्दीतील अनेक ठिकाणी दुभाजक आहेत. मात्र, या ठिकाणी सूचना फलक लावले नसल्याने वाहनचालक यांना अडथळा निर्माण होतो. अनेकदा अपघातही होत आहेत. गणपतीपूर्वी दुभाजक ठिकाणी सूचना फलक लावलेत का? याची प्रांताधिकाऱ्यांनी पाहणी करावी. यामध्ये कुचराई झाली आणि अपघात झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक