5th Generation Fighter Jet : भारतात स्वदेशी फायटर जेटचा प्रोग्रॅम सुरु, हे विमान इतकं घातक असेल की…

नवी दिल्ली : भारताची आता अगदी वेगाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. भारताच संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता हे मुख्य लक्ष्य आहे. भारतात आता त्या दृष्टीनेच एका स्वदेशी फायटर विमानाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळेच चीनला कडवी टक्कर देता येईल. चीनवर जरब बसवण्यासाठी भारत आता पाचव्या पिढीच AMCA फायटर विमान बनवणार आहे. २०२८ पर्यंत स्वदेशी बनावटीच्या Advanced Medium Combat Aircraft च पहिलं प्रोटोटाइप बनवण्याची योजना आहे. भारतामधलं हे पाचव्या पिढीच पहिलं AMCA स्टेलथ फायटर जेट असणार आहे. २७ टन जवळपास या विमानाच वजन असेल. हे विमान जास्त वजनाची शस्त्र घेऊन उड्डाण करण्यासाठी सक्षम असेल.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाचव्या पिढीच स्टेल्थ फायटर जेट AMCA बनवण्यासाठी कॅबिनेट कमिटीने हिरवा झेंडा दाखवलाय. १५ हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले आहेत. इंडियन एअर फोर्स आणि DRDO मध्ये या संदर्भात नुकतीच बैठक झाली. तिथे AMCA ची डिजाईन, डेवलपमेंट आणि योजनेबद्दल सविस्तर चर्चा झाली. या विमान निर्मिती प्रोजेक्टच्या आराखड्याचा खूप बारीक पद्धतीने आढावा घेण्यात आलाय.




कसं असेल हे विमान?


AMCA हे खास क्षमतांनी सुसज्ज असलेलं फायटर जेट असणार आहे. हे विमान शत्रुला ट्रॅक करता येऊ नये, यासाठी त्यामध्ये काही खास फिचर्स असतील. जनरल इलेक्ट्रिक ४१४ (GE-414) दोन इंजिन असतील. AMCA विमान बनल्यानंतर भारताचा रशिया, अमेरिका आणि चीन या देशांच्या पंक्तीत समावेश होईल.




इंडियन एअर फोर्सची योजना काय?


शेजारी देशांकडून असलेली आव्हान लक्षात घेऊन भारताला हे फायटर जेट लवकरात लवकर विकसित करायचं आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या सुद्धा या प्रोजेक्टमध्ये सहभागी होतील. ६५ हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करण्याच्या दृष्टीने AMCA विमान बनवण्यात येईल. भारतीय नौदलासाठी आणि इंडियन एअर फोर्स हे विमान विकसित करण्यात येईल. इंडियन एअफोर्स AMCA विमानाच्या ७ स्क्वॉड्रन बनवण्याचा विचार करत आहे.




भारताकडे सध्या कुठलं सर्वाधिक घातक फायटर विमान आहे?


अमेरिकाकडे F-३५ आणि रशियाकडे Su-५७ च्या रुपाने पाचव्या पिढीची स्टेल्थ फायटर विमाने आहेत. सध्या भारताकडे सर्वात अत्याधुनिक म्हणजे राफेल फायटर विमान आहे. ४.५ जनरेशनच हे विमान फ्रान्सकडून विकत घेतलय.


Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे