Kavad Yatra : कावड यात्रा उत्सवादरम्यान वाहतूक मार्गात बदल!

पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन


अमरावती : श्रावणातील शेवटच्या सोमवारी अमरावती जिल्हयातील दर्यापूर शहरात मोठ्या प्रमाणावर कावड यात्रा उत्सव साजरा होतो. कायदा व सुव्यवस्थाच्या अनुषंगाने दर्यापूर ते मुर्तिजापूर मार्गावर वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी सौरभ कटियार यांनी जारी केला आहे.


दर्यापूर ते मुर्तिजापूर या रोडवर कावड यात्रा मंडळ व शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. सदर रोडचे रुंदीकरण झाल्याने रोडवर वाहतुक वेगाने सुरू राहते. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेकरिता तसेच कावड यात्रा मिरवणूक शांततेत पार पडावी या करीता दर्यापूर ते मुर्तिजापूर मुख्य मार्ग १ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेपासून ते २ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत दर्यापूर-आमला-आसरा फाटा-बोटा-हिरापूर ते मुर्तिजापूर मार्गे (फक्त एस.टी. बस वाहतुक वगळून) वळविण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल.

Comments
Add Comment

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली